भारतामध्ये काही लोक चपातीपेक्षा भात जास्त प्रमाणात खातात. तसेच काही लोकांना भातावर तूप घालून किंवा डाळीमध्ये भात मिक्सकरून खायला खूप आवडते. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो. काही लोकांना भाताशिवाय जेवणच जात नाही. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. तर चला जाऊन घेऊया भात खाल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात, आणि भात किती प्रमाणात खाला पाहिजे.
हे ही वाचा : चेहरा उजळण्यासाठी करा हे घरगुती उपाय
तांदळामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.
जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. भातामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.
कमी प्रमाणात तांदळाचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होते. यातील पोषक घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते . पण भात खाल्याने वजन कमी होते की नाही यावर सर्वांचा वेगवेगळा अनुभव असतो.
आपल्या हाय बीपी असेल तर दररोज एक वाटी भात खाल्ला पाहिजे. यात सोडियमची मात्रा नसते म्हणून हृदयासंबंधी आजरास मदत होते.
तसेच भाताची पेज पिल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
भात जास्त प्रमाणात खाऊ नये. कमी प्रमाणात खाणे. जर तुम्हाला आरोग्यदायी काही समस्या असतील तर तुम्ही डॉकटरचा सल्ला घ्या आणि मग भाताचे सेवन करा.
शरीरात उष्णेतचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही भाताचे सेवन करू शकता त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये थंडावा जाणवेल.
तसेच भातामध्ये वेगवेगळे प्रकार असतात .
दुपारच्या वेळी भात आणि डाळ खाणे आणि रात्रीच्या वेळी भाजी चपाती खाणे त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहते आणि दिवसभरात एक वाटी भात खाल्या सारखा होईल.
हे ही वाचा :
उपवासाठी टेस्टी डोसा खास तुमच्यासाठी