ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा टी२० सामना टीम इंडियाने उत्तम कामगिरी केली. ६ विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. या विजयानंतर टीम इंडियाने ९ वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी२० मालिका जिंकली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे सूर्यकुमार यादव.
ओपनर केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीच्या सोबतीने सुर्यकुमारने डाव सांभाळला. टीम इंडियाच्या हातातून मॅच जाणार अशी स्थिती असताना स्कायने ६९ रन्सची तुफान खेळी करत भारताकडे सामना खेचून आणला. सूर्यकुमारच्या सिक्स आणि फोरच्या आतीषबाजीने भारताने तिसऱ्या सामन्यासह सिरीजही काबीज केली. मात्र अगदी या सामन्यापूर्वी सुर्यकुमार यादव प्रचंड आजारी असल्याचं समोर आलंय.
From setting the stage on fire to a special pre-match tale! 🔥 😎
Men of the hour – @surya_14kumar & @akshar2026 – discuss it all after #TeamIndia‘s T20I series win against Australia in Hyderabad. 👍 👍- By @RajalArora
Full interview 🔽 #INDvAUS https://t.co/rfPgcGyO0H pic.twitter.com/rDWz9Zwh3h
— BCCI (@BCCI) September 26, 2022
,
हेही वाचा :
आमदार संतोष बांगर यांच्या ताफा शिवसैनिकांनी अडवला, ‘माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे करणार’
सूर्यकुमार यादवमुळे टीम इंडिया उतरलेल्या हॉटेलमध्ये रात्री ३ वाजता पळापळ सुरु होती. पोटदुखीमुळे सूर्यकुमारला तीव्र वेदना होत होत्या. सीरीज विजयानंतर त्याने स्वत: हा खुलासा केला.
सूर्यकुमारची मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सीरीजमध्ये एकूण ८ विकेट घेणारा अक्षर पटेल प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. मॅच जिंकल्यानंतर सूर्यकुमारने अक्षरसोबत चर्चा केली. त्यावेळी त्याने रात्री ३ वाजताच्या परिस्थितीबद्दल खुलासा केला. बीसीसीआयने दोघांच्या संवादाचा व्हिडिओ शेयर केलाय.
Navratri 2022 : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचा डोळा…
सुर्यकुमारने किस्सा सांगितला
वातावरण बदललय. प्रवास सुरु आहे, त्यामुळे पोटदुखीचा त्रास झाला, ताप आला, असं सूर्यकुमारने सांगितलं. सूर्यकुमारने डॉक्टर आणि फिजियोला विचारलं, ही वर्ल्ड कप फायनलची मॅच असेल, तर तुम्ही कसे रिएक्ट व्हाल.?, मी आजारपण घेऊन बसू शकत नाही. काहीही करुन मला मॅचसाठी फिट करा, असं सूर्याने त्यांना सांगितलं. कुठलही इंजेक्शन द्याव लागलं, गोळी खावी लागली तरी चालेल पण संध्याकाळच्या मॅचपर्यंत मला फिट करा, असं सूर्या त्यांना म्हणाला. एकदा मैदानात उतरल्यानंतर टीम इंडियाची जर्सी घातल्यानंतर वेगळ्याच भावना असतात, असं सूर्या म्हणाला.