शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांनी काल नवरात्री उत्सव निमित्त मुलुंडच्या अनेक देवींच्या मंडळांना भेट दिली त्या वेळी त्यांनी ‘टाईम महारष्ट्राशी’ बोलतांना सांगितलं की देवीच्या चरणी राजकीय स्थिरता प्राप्त होउ दे आणि शिवसेनेच्या मूळ वृक्षावर काही घाव घालणारे नतदर्शक लोकं आली आहे त्यांना तू योग्य ती समज दे असं विनायक राऊत यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे असं सांगतील. विनायक राऊत यांनी ठाण्याचे शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
नरेश म्हस्के हे शिंदे गटात सामील झाले आहेत. म्हणून विनायक राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली असा आरोप करण्यात आला. त्यावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी नरेश म्हस्के यांना प्रतिउत्तर दिलं आहे. नरेश म्हस्केना अक्कल दाढ आली कि नाही बघावी लागेल असं नरेश म्हस्के यांनी ‘टाईम महारष्ट्रा’ सोबत बोलतांना सांगितले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून बंड केलेले खासदार प्रताबराव जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर जोरदार टीका केली. सचिन वाझे मातोश्रीवर १०० खोके पाठवायचे असा आरोप करण्यात आला. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी म्हटलं कि मी असं बोलाच नाही. त्यावर विनयक राऊत यांनी शिंदे गट संभ्रमित झाले आहेत असं बोले.
येत्या काळात शिवसेना अशीच शिवसेना अशीच वाढू दे आणि देवीच्या चरणी सगळ्यांना चांगला आरोग्य लाभू देऊ दे अशी प्राथना केली आहे असा विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘राजकुमार’ गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
Dasara Melava : दसरा मेळाव्याची जोरदार तयारी; ठाकरे गटाकडून दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी