spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुरुक्षेत्र असो की लंका – युद्ध हा शेवटचा पर्याय; पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच कारगिलमध्ये दाखल झाले असून ते भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित केले असून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य आहे अशा भावना मोदींनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. “कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही” असं म्हणत नरेंद्र मोदींकडून कारगिलच्या विजयाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी लढत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कारगिलमधील दिवाळीच्या दिवशी सशस्त्र दलाच्या शौर्याचे कौतुक केले. १९९९ मधील भारत-पाकिस्तान युद्धाची आठवण करून देताना ते म्हणाले, “कारगिल कधीही पाकिस्तानकडून हरले नाही”. “परंपरेने, आम्ही युद्ध आणि संघर्षाला विरोध केला आहे. कुरुक्षेत्र असो की लंका – युद्ध हा शेवटचा पर्याय होता. पण संरक्षण क्षमतांशिवाय शांतताही शक्य नाही,” असे पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भरता वाढवल्याबद्दल त्यांनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचेही कौतुक केले. “मला आनंद आहे की आता जवळपास ४०० शस्त्रे भारतात तयार होतील, ज्यामुळे परकीय राष्ट्रांवरील आपले अवलंबित्व कमी होईल. आपले सैन्य अधिकाधिक मेड-इन-इंडिया शस्त्रांकडे वळत आहे. सुपरसॉनिक शस्त्रांपासून ते हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरपर्यंत भारताची लष्करी ताकद वाढत आहे. आज देश केवळ स्वत:च्या गरजा भागवत नाही तर संरक्षण निर्यातीवरही लक्ष केंद्रित करत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

 “तुम्ही आहात म्हणून सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझं कुटुंब आहे” असंही मोदी म्हणाले आहेत. याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावर होती, ती आता पाचव्या स्थानावर आली आहे असं मोदी म्हणाले असून ते आज जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

हे ही वाचा :

श्रीकांत शिंदे मनसे कार्यालयात; चर्चेला पुन्हा उधाण

राणा आणि बच्चू कडू यांच्या मुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये संघर्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss