spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरकडे पायी निघालेले सहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील काही भाविक कार्तिकी यात्रेसाठी पायी निघाले होते. जुनोनी गावाजवळ वाहनाने पाठीमागून धडक दिली. सामने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल १६ जणांना कारने चिरडलं आहे, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगोला पोलिस घटना स्थळी पोचले आहेत.

सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते. मात्र वाटेत सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघातात विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी आपले प्राण गमावल्याने करवीर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार अडचणीत; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले

डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार अडचणीत; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss