spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs ENG : टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारतविरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार, टीम इंडिया पुढे असतील ही आव्हाने

भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही संघाला जेतेपद कायम राखता आले नाही आणि यजमानांनाही बाजी मारता आलेली. तेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घडले. इंग्लंडने ४ विकेट्सने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप झाले. इंग्लंड आयसीसी स्पर्धांमध्ये सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आता उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे आणि रोहित अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.

हेही वाचा : 

Thackeray Vs Shinde : सिल्लोडमध्ये ठाकरे-शिंदेच्या सभेची चर्चा, आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स पाहिले का?

रोहितला पाच सामन्यांत १७.८० च्या सरासरीने केवळ ८९ धावा करता आल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितला केवळ चार धावा करता आल्या होत्या. त्याचवेळी नेदरलँडविरुद्ध हिटमॅनने ५३ धावांची इनिंग खेळून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते. मात्र, नंतर रोहितला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करता आली नाही. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्माला फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

तर दुसरीकडे यादव आणि विराट कोहली यांच्या कामगिरीत व इतर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य दिसून आले आहे आणि हे दोन्ही खेळाडू खूप धावा करत आहेत. या दोघांशिवाय इतर फलंदाजांची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. रोहित, हार्दिक, दिनेश कार्तिक हे फलंदाज म्हणून स्पर्शाच्या बाहेर दिसत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुलने गेल्या दोन सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत, ही उपांत्य फेरीपूर्वी चांगली बातमी आहे. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात संपूर्ण फलंदाजीला क्लिक करावे लागेल.

मुख्यमंत्री, उद्योग आणि कृषी मंत्र्यांचं नाव काय गद्दार; आदित्य ठाकरे

भारताचा लाजिरवाणा पराभव

२०१२ मध्ये इंग्लंड आणि भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपच्या स्पर्धेत तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आला. या सामन्यात इंग्लंडनं २००९ च्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला आणि सामना ९० धावांनी एकतर्फी जिंकला.महत्वाचे म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात भारत आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहे. यापूर्वी भारत आणि इंग्लंड नॉक आऊट सामन्यात कधीच आमने-सामने आले नाहीत.

EWS Reservation : आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा, १० टक्के आरक्षण वैधच

Latest Posts

Don't Miss