spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आव्हाडांवरील कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई…

विविध पक्षातील नेते या प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. विविध पक्षातील नेते या प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ”जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही. हे राज्य कायद्याचं आहे, आणि कायद्याने चालतं.”

गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ते म्हणाले की, मी सगळं सहन करेन पण ३५४ (विनयभंग) मान्य करणार नाही. ३५४ आणि ३७६ यासाठी माझा जन्म नाही. मला जे कलम लावलेले त्याच्याबद्दल वाईट वाटलं. माझ्यावर खूनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मान्य नाही. ते म्हणाले की, समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आले. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये.

नेमके काय आहे प्रकरण?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर रविवारी कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड प्रकरणी नीलम गोऱ्हेंनी दिली प्रतिक्रिया, थेट कंगनाशी केली केतकी चितळेची तुलना

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss