अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) ही कायम चर्चेत असते. तसेच अनन्या पांडे ही सोशलमिडीयावर कायम सक्रिय असते. अनन्या पांडे आज दुपारी वांद्रेत गेली होती. नुकतच अनन्या पांडेने तिच्या इस्टाग्रामवरील अधिकृत खात्यावर तिचे वांद्रे येथील काही फोटो शेअर केले आहेत. अनन्याने तिचे पिझ्झा खाताना ,मैत्रिणीनंसोबत रस्त्यावर फिरताना आणि एक कप कॉफीचे फोटो पोस्ट केले आहेत. अनेक चाहत्यांसह सुहाना खान (Suhana Khan), महीप कपूर (Maheep Kapoor)आणि रिया कपूर (Rhea Kapoor) यांनीही तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आज रविवार म्हणून अनंन्या आज दुपारी वांद्रेत फिरायला गेली होती या दरम्यान तिने तिचे काही फोटो काढले आणि ते तिच्या इस्टाग्रामवरील अधिकृत खात्यावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अनन्याने कार्गो पँटसोबत पांढरा क्रॉप टॉप घातला होता. तिने रविवार दुपारसाठी म्हणून निली कॅप परिधान केला होती. तिने कानातले घातले होते ते डोळ्यांसारखे दिसत होते आणि स्लिंग बॅग नेली होती. तिने तिच्या पाठीमागून चालत असलेल्या तिच्या मैत्रिणींना कॅप्चर करणारा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. ती पिवळ्या भिंती असलेल्या अरुंद गल्लीत उभी राहिली आणि मागे वळून बघत पोझ दिला आहे. तिने एका स्त्रीच्या चित्रासह एका रंगवलेल्या भिंतीचे चित्र देखील शेअर केले आणि त्यात लिहिले होते, “स्त्री होणे संघर्ष नाही तर एक शक्ती आहे.”
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले की, “रविवारी दुपारी वांद्रे येथे फिरण्यासारखे काही नाही. यावर चित्रपट निर्मात्या रिया कपूरने टिप्पणी केली, “क्यूट दिसत आहेस.” तर संगीतकार लिसा मिश्रा यांनी लिहिले, “खूपच क्युट दिसत आहे.”या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनन्याच्या एका चाहत्याने लिहिले, “व्वा खूपच छान.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली, “अनन्य बाहुलीसारखी दिसत आहे.” इतर चाहत्याने लिहिले,“मिसिंग वांद्रे वॉक”
अनन्या अखेरची विजय देवरकोंडा सोबत लिगर या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटाने विजयचे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.
अनन्या सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्यासोबत खो गए हम कहाँ आए आणि आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्लचा सीक्वल पाइपलाइनमध्ये दिसणार आहे.ड्रीम गर्ल २ हा चित्रपट २९ जून २०२३ रोजीलंबकारच प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमागृहात येणार होणार आहे.
हे ही वाचा :
यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले