spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारावर संजय राऊतांचा हल्लाबोल

गुजरातमध्ये (Gujarat Election 2022) भाजपच्या (BJP) प्रचारावर बोट ठेवत संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत.

Sanjay Raut On Gujarat Election : गुजरातमध्ये (Gujarat Election 2022) भाजपच्या (BJP) प्रचारावर बोट ठेवत संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र निवडणुक यंत्रणेवर विश्वास नाही अशी लोकांची भावना असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणूक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले.

आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज १४ जिल्ह्यांतील ९३ जागांवर मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे ९३ मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.

गुजरात निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी त्यांचा बराचशा वेळ गुजरातला दिला आहे, पंतप्रधान मोदी हे ३ वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणूक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले. तसेच लोकं असे म्हणतात, निवडणूक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, म्हणजेच सरकारच्या विरुद्ध लोकांची भावना असली तरी भाजपचे उमेदवार जिंकतील असं होणार नाही. मशीन गडबड करून किती गडबड करणार, वेट अँड वॉचची भूमिका घेणे योग्य आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंनी किमान कर्नाटक-बेळगाव सीमारेषेला स्पर्श तरी करावा असं राऊत म्हणाले. बाकी तुम्हाला काय कबड्डी खेळायचे असेल ते इथे खेळा. पण हे लाचार लोकं आहेत, असं वक्तव्य करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराज कोकणात जन्मले असं प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं होतं. यावर शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी का खेळता? संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे. भाजपला शिवरायांचा इतिहास का बदलायचा आहे? असा सवाल करत राऊतांनी टीका केलीय

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

नितीन गडकरींचं नाव घेत सुषमा अंधारेंनी केला गोपीनाथ मुंडेंविषयी मोठा गौप्यस्फोट

जेलमध्ये डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss