spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे आणि बोम्मई यांच्यात फोनवरून चर्चा, तरी बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

मागील काही दिवसांपासून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मंगळवारी दि. ६ डिसेंबर रोजी अधिक तापला. सीमालगत भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद दिसून येत आहेत.

Karnataka Maharashtra border issue : मागील काही दिवसांपासून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मंगळवारी दि. ६ डिसेंबर रोजी अधिक तापला. सीमालगत भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद दिसून येत आहेत. यामुळे बस सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील एसटी बसला आणि गाड्यांवर कर्नाटकाच्या सीमेवर हल्ले करण्यात आले तर, दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कर्नाटकातील बसेसना काळं फासण्यात आलं त्यावर जय महाराष्ट्र असं लिहण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमधील वाढता तणाव पाहता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याची माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.यासंबधी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये बोम्मई म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली आहे, दोन्ही राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले आहे. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असेही शेवटी बोम्मई म्हणालेत.

कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकल्याने आधीच टीकेचे धनी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी वेगाने हालचाली करून सीमावादाबाबत कठोर भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही दिली. दरम्यान याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली भूमिका कायम असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर फोनवर चर्चा झाल्याची माहिती बोम्मई यांनी ट्वीटरवरुन दिली.

जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर सीमाप्रश्न पुन्हा तापला. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या राज्याच्या मंत्र्यांचा मंगळवारचा नियोजित बेळगाव दौरा लांबणीवर टाकूनही कर्नाटकच्या कुरापती कायम राहिल्या. कर्नाटकातील हिरे बागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोंधळ घालून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. जवळपास सहा ट्रकची नासधूस करण्यात आली. कर्नाटक पोलीस आणि वेदिकेचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली.

बेळगावजवळ झालेल्या ट्रकवरील हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. शिंदे आणि बोम्मई यांची लवकरच भेट होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

 फडणवीस काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना हे प्रकार घडणे चुकीचे आहे. देशात संविधानाने कोणालाही कुठेही जाण्याचा, राहण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे. कोणतेही राज्य कोणालाही रोखू शकत नाही. संविधानातील तरतुदींचे पालन राज्य सरकार करीत नसेल, तर आम्हाला केंद्राकडे जावे लागेल. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी भूमिका या साऱ्या प्रकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली

हे ही वाचा : 

मुंबईकरांचा ‘श्वास’ गुदमरला !, हवेत प्रदूषणाची वाढ

Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss