१६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानवर निर्णायक आणि ऐतिहासिक विजय (Vijay Diwas 2022) मिळवला. तेव्हापासून हा दिवस भारतात विजय दिवस साजरा केला जातो. १९७१ चे युद्ध हे भारत आणि पाकिस्तान (India Pakistan war) यांच्यातील लष्करी संघर्ष होते. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमुळे ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय हवाई दलाच्या ११ स्थानकांवर पाकिस्तानने केलेल्या प्री-एम्प्टिव्ह एअर स्ट्राइकने त्याची सुरुवात झाली. परिणामी, भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानमधील बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात बंगाली राष्ट्रवादी गटांना पाठिंबा देण्याचे मान्य केले. १६ डिसेंबर हा सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. ही तीच तारीख आहे जेव्हा १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या सुमारे ९३,००० सैनिकांनी भारतासमोर शस्त्रे टाकली होती. भारताच्या विजयाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली.
हेही वाचा :
Dry skin हिवाळयात कोरड्या त्वचेपासून त्रस्त आहत? मग चेहऱ्यासाठी ‘या’ फळाचा वापर करा
भारत-पाकिस्तानमधील या १४ दिवसांच्या युद्धानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. त्याचा एक भाग सध्या पाकिस्तान म्हणून ओळखला जातो आणि दुसरा पूर्व पाकिस्तान ज्याला आपण आज बांगलादेश म्हणून ओळखतो.या युद्धात उत्तराखंडच्या रणबांकुरांनीही पाकिस्तानी सैन्याला धूळ चाटण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपण विजय दिवस हा विजयाचा उत्सव म्हणून साजरा करत असलो तरी या युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या हौतात्म्याने आपल्या डोळ्यांत पाणी येते.
On the eve of Vijay Diwas, attended the ‘At Home’ reception at Army House. India will never forget the valour of our Armed Forces that led to the win in the 1971 war. pic.twitter.com/apG69cObzw
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2022
Christmas 2022 : व्हाट्सअप द्वारे नाताळच्या शुभेच्छा
हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक युद्ध मानले जाते. त्यामुळेच भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९७१ च्या युद्धात सुमारे ३,९०० भारतीय जवान शहीद झाले होते आणि सुमारे ९, ८५१ जखमी झाले होते. भारताने बांगलादेशला एक नवीन राष्ट्र म्हणून उदयास येण्यास मदत केली होती आणि युद्धात पाकिस्तानला पराभूत केले होते, म्हणून त्याच्या विजयाचे यश म्हणून संपूर्ण देशात विजय दिवस साजरा केला जातो.
Bigg Boss Marathi 4 विकासच्या खेळावर अमृता धोंगडे संतापली, पुन्हा एकदा झाला जोरदार राडा