महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) येत्या १७ डिसेंब र२०२२ रोजी राज्य सरकारविरोधात (Maharashtra government) रस्त्यावर उतरून महामोर्चा काढणार आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख (shivsena)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी केली आहे. राज्य सरकारकडून आणि राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे असा आरोप विरोधक करत आहेत. या विरोधातच उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली. राज्यपालांना हटवले जावे, भाजपच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा केला जाणारा अपमान याविरोधात हा मोर्चा असणार आहे अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. या संधर्भात काल अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी महामोर्चाबद्दल भूमिका मांडली. येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे.
हेही वाचा :
Maharashtra news राज्यात पुणे, वरळीनंतर आज ‘या’ शहरात बंदची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
महाविकास आघाडीची या मोर्चासाठी पूर्ण तयारी झालीय. विशेष म्हणजे या मोर्चासाठी आता महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती केली जातेय. त्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा कशासाठी या मथळ्याखाली अनेक उत्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलायय. महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रेमींचा महाराष्ट्र द्रोह्यांविरुद्ध हल्लाबोल! महाविकास आघाडीचा महामोर्चा, १७ डिसेंबर २०२२ रोजी, सकाळी ९.३० वा. स्थळ – रिचर्डसन ॲंड कृडास, नागपाडा मुंबई पासून!#HallaBol #हल्लाबोल #MaharashtraPrem#Maharashtra pic.twitter.com/ZPL63PjZQN
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 15, 2022
अजित पवार यांनी म्हटले, या मोर्चात मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरीक सहभागी होतील. महागाई हा देखील या मोर्चातील प्रमुख मुद्दा आहे. सर्व विरोधी पक्षांना अतिशय समजंस भूमिका घेतली आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चासाठी एकत्र आले आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने, मोर्चा विध्वंसक होणार नाही, शांततेने आम्ही मोर्चा काढणार आहोत. आम्ही या मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. अजून परवानगी मिळालेली नाही. पण आम्हाला परवानगी मिळेल, असा मला विश्वास आहे.
Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन