Salman khan – Aishwarya rai : संपूर्ण बॉलीवूड मध्ये ऐश्वर्या आणि सलमान यांची जोडी हि गाजलेली आहे. या दोघांनीही अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ९० च्या दशकात ऐश्वर्या आणि सलमान खान (Salman khan) एकमेकांना डेट करत होते. ऐश्वर्या राय (Aishwarya rai) १९९४ मध्ये प्रसिद्ध झाली जेव्हा तिने प्रतिष्ठित मिस वर्ल्डचा किताब पटकावला. तिची सिने कारकिर्द जेवढी गाजली तेवढंच तिच्या खासगी आयुष्याचीही जोरदार चर्चा झाली. ऐश्वर्या राय बच्चन आपल्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. पण काही वर्षांपूर्वी सलमान खानशी तिचं असलेलं नातं आजही अनेकांच्या लक्षात आहे. सलमान तर ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. ऐश्वर्या-सलमान (Salman khan – Aishwarya rai) यांना बऱ्याचदा एकत्रही पाहिलं गेलं. यांच्या अफेअरची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. परंतु त्यांचं अफेअर आणि ब्रेकअपवर आजही चर्चा होताना दिसतात.
एकेकाळी सलमान ऐश्वर्याच्या प्रेमात इतका वेडा होता की त्याला काहीही करून तिच्याशी लग्न करायचं होतं. ऐश्वर्याचंही सलमानवर अतोनात प्रेम होतं. अखेर सलमानने ऐश्वर्याला लग्नासाठी मागणी घातली. पण हा तो काळ होता जेव्हा ऐश्वर्या तिच्या करिअरच्या शिखरावर होती आणि तिला घाईत लग्न करून करिअर धोक्यात आणायचं नव्हतं. जेव्हा ऐश्वर्याने सलमानशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. नोव्हेंबर २००१ मध्ये एका रात्री, सलमान खान ऐश्वर्या रायच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला आणि मध्यरात्री तिच्या घराचा दरवाजा जोरात वाजवू लागला. या अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावर ऐश्वर्याचा फ्लॅट होता.
तेथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, सलमानला आपलं म्हणणं मांडायचं होतं, पण ऐश्वर्याने त्याची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने त्याने तिथून उडी मारण्याची धमकी दिली. पहाटे ४ वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्याचा दरवाजा वाजवत राहिला. त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं असल्याचं सांगण्यात येतं. नंतर ऐश्वर्याकडे दरवाजा उघडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खरं तर सलमानने हे सर्व केले कारण त्याला ऐश्वर्या लग्नासाठी हो बोलेल असं वाटलं होतं. नंतर सलमानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याला ऐश्वर्याला गमवायचं नव्हतं आणि याच भीतीमुळे तो अनेकदा हिंसक झाला.
अनेक महिने सलमान आणि ऐश्वर्याने त्या रात्री झालेल्या गदारोळावर मौन बाळगले. सुमारे चार महिन्यांनंतर, सलमानने स्वतः मान्य केलं की त्याने त्या रात्री ऐश्वर्याच्या घराबाहेर गोंधळ घातला, परंतु मीडियाने अतिशयोक्ती केली. फेब्रुवारी २००२ मध्ये सलमानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘मी ऐश्वर्यासोबत नात्यात आहे. जर तुम्ही नात्यात भांडत नसाल तर याचा अर्थ तुम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही. मी अनोळखी व्यक्तीशी का भांडणार? अशा गोष्टी आपल्यात घडतात कारण आपण एकमेकांवर प्रेम करतो. आता तर पोलिसांनी मला त्या इमारतीत जाण्यापासून रोखलं आहे.’
हे ही वाचा:
BTS बीटीएस ग्रुपने केला ‘बेशरम रंग’ या गाण्यावर धमाल डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल
IND vs BAN याआधीही मीरपूरमध्ये दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड