spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 जणांना गडचांदूर पोलीसांनी बाहेर काढले

द्रपूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले असुन आता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुर स्थिती निर्माण झाली आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ दोन दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने २२ वाहनचालकांना बाहेर काढले.

Latest Posts

Don't Miss