अभिनेता प्रसाद ओकची (Prasad Oak) मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका अक्षरशः जगला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रचंड प्रसिद्धी नंतर आता पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या संबंधातील काही रहस्य उलघडणार आहेत.
View this post on Instagram
हेही वाचा :
Viral video भर वर्गात शिक्षकाने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका
“धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत” अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली आहे. कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर काल एक कार्यक्रम पार पडला.
धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘आनंद दिघे’ (Anand Dighe) यांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल. यावर मंगेश देसाई यांनी असे सांगितले की, ‘ धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत”.
दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर, विरोधकांच्या घोषणांनी आजही विधानभवन परिसर दणाणला
धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ओफिसवर सुपरहिट झाला होता. आता त्यांचं चरित्र पुस्तकरूपातही वाचायला मिळणार आहे.