सरत्या वर्षात बॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येते आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नितिन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवस त्यांना व्हेटिंलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचे निधन झाली आहे
चित्रपटसृष्टीने आणखी एक मोठे नाव गमावले, चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांचे गुरुवारी (२९ डिसेंबर २०२२) मुंबईत निधन झाले. #NitinManmohan #BollywoodKiGandagi pic.twitter.com/Z5jptrFZNG
— Time Maharashtra (@TimeMaharashtra) December 29, 2022
चित्रपट निर्माते नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचं निधन झालंय. गुरुवारी सकाळी मुंबईत त्यांचं निधन झालंय. ते ६० वर्षांचं होते. ३ डिसेंबरपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गेले १५ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. नितीन मनमोहन यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितिन मनमोहन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे सुपुत्र होते. त्यांनी सिनेसृष्टीतील करिअरमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.
नितीन मनमोहन हे चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक मनमोहन यांचं पुत्र होते. ज्यांना ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’सह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. वडिलांप्रमाणे नितीन मनमोहनही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये ‘बोल राधा बोल’ (१९९२), ‘लाडला’ (१९९४), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘आर्मी स्कूल’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ (२००१), ‘दस’ (२००५) यांचा समावेश आहे. , ‘चल मेरे भाई’ (२००१), ‘महा-संग्राम’ (१९९०), ‘इन्साफ: द फायनल जस्टिस’ (१९९९७), ‘दिवांगी’, ‘नई पडोसन’ (२००३), ‘अधर्म’ (१९९२), ‘ बागीमध्ये ‘ईना मीना दीका’, ‘अस्तू’, ‘टँगो’सारख्या अनेक मोठे चित्रपटांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक