मुंबई : ‘कॉफी विथ करण’या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार आपले खासगी आयुष्य आणि रिलेशनशिप याबाबत अनेकदा खुलासा करतात. नुकताच ‘कॉफी विथ करण’ शो चा सातवा सीझन सुरू झाला आहे. शो च्या पहिल्या एपिसोड मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग ने हजेरी लावली होती. पहिल्याच एपिसोड मध्ये दोघांनी ही आपल्या खाजगी आणि वैवाहिक जीवना बद्दल अनेक खुलासे केले. यावेळी अनेक सिक्रेट शेअर करण्यात आले. या शो च्या दुसऱ्या एपिसोड मध्ये सारा अली खान आणि तिची बेस्ट फ्रेंड जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली. बऱ्याचदा दोघी एकत्र वॅकेशन एन्जॉय करताचे फोटो ही शेअर करतात. यावेळी सारा आणि जान्हवी ने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. जे ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
An absolute riot with these two in the Koffee house! Episode 2 of #HotstarSpecials #KoffeeWithKaranS7 is NOW STREAMING only on Disney+ Hotstar!❤️❤️❤️
Watch here: https://t.co/oBBJA74n77 @DisneyPlusHS #JanhviKapoor @SaraAliKhan @apoorvamehta18 @jahnvio @aneeshabaig @Dharmatic_ pic.twitter.com/rZFT6ZEPd5
— Karan Johar (@karanjohar) July 14, 2022
जान्हवी आणि साराने देखील आपल्या खासगी आयुष्याबाबत ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये अनेक खुलासे केले. पण या दोघींच्या एका गोष्टीबाबत करण जोहर ने जो मोठा खुलासा केला आहे. ते ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गप्पा गप्पांमध्ये करणने म्हटलं की, “आता तुमच्या दोघींची मैत्री कितपत आहे याची मला कल्पना नाही. कोविड काळाच्या आधीची ही गोष्ट आहे. तुम्ही दोघींनी दोन सख्ख्या भावांना डेट केलं आहे. ते दोन्ही भाऊ माझ्याच इमारतीमध्ये राहत होते. या दोन सख्ख्या भावांमुळेच आपल्या तिघांमध्ये मैत्री वाढली आहे.” हे ऐकून ते दोन भाऊ कोण असतील याबाबत सारा आणि जान्हवीच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले. जान्हवी – सारा या दोघी वीर आणि शिखर पहाडिया या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या. वीर-शिखर यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध आहे. वीर 28 वर्षाचा असून दुबईमध्ये तो सध्या शिक्षण घेत आहे. तर शिखर 23 वर्षाचा आहे आता तो लंडनमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला आहे.
हेही वाचा :
नवी मुंबईत गुन्हे शाखाची मोठी कारवाई, 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त
करण जोहर या शो मध्ये ज्या पाहुण्यांना बोलवतो तेव्हा तो त्यांना असे काही प्रश्न विचारतो की ती उत्तर ऐकून प्रेक्षक आणि चाहत्यांना धक्का बसतो. हा शो याच कारणामुळे इतका हिट असल्याचं म्हटलं जातं.