spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठक घेतली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीदरम्यान राज्य सरकारने मावळत्या सरकारच्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. त्याच मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

ठाकरे सरकारने घाईगडबडीत अमलात आणलेले काही निर्णयाचा प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करत त्यावर, आम्ही पुन्हा एकदा ठराव मंजूर केला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर वादात असलेला आणखीन एक निर्णय नवी मुंबई विमानतळाचे नाव हे दि.बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल अशी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचा :

सर्वात मोठ्या लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न :संजय राऊत

Latest Posts

Don't Miss