spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंनी ठाणेकरांना घातली साद, खून देने की जरुरत नहीं आप…

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत.एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडांनंतर शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली आणि शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन भाग झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) प्रथमच ठाण्यात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांचं ठाकरे गटाकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मुंलुंड ठाणे टोलनाक्यावर (Mulund Thane toll booth) अनेक ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी आजच आपण ठाण्यात लवकर सभा घेणार असून सगळ्या गोष्टींना उत्तरं देणार असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे सभा कधी घेणार आणि नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे सभा घेताना एकनाथ शिंदे यांचा समाचार घेणार हे नक्की आहे. शिवसेनेत जे काही घडलं त्यामुळे देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं. तसंच ५० खोके एकदम ओके ही घोषणा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही पोहचली आहे त्याबद्दल आपल्याला संजय राऊत यांनी सांगितलं असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

‘सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा सुरू आहे. तो समोर दिसत असून सुद्धा शिवसेना मुळ हेतूपासून दूर गेलेली नाही. अन्यायावर लाथ मारण्याचे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ८०टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचे काम राजन विचारे यांनी केलं आहे. अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहे, ते इथं आहे. आणि जे विकले गेले ते काय भावाने विकले गेले ते सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणताच ५० खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजीच कार्यकर्त्यांनी केली.

Latest Posts

Don't Miss