दि २३ जानेवारी म्हणजेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. तसेच त्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना दोन्ही नेत्यांनी शिंदे गट आणि भाजप वर जोरदार टीका तर केलीच पण त्याचसोबत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यावरही टीका केली. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 25, 2023
आज प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते –
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
हे ही वाचा:
Hindenburg रिसर्च कंपनीविरुद्ध गौतम अदानी करणार कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Republic Day 2023, यंदा प्रजासत्ताक दिनानिम्मित व्हाट्सअँप द्वारे द्या शुभेच्छा!