९ फेब्रुवारी पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघामधला एक खेळाडू जी एकमताने समोरच्या संघासाठी धोका मानला जातो तोच खेळाडू म्हणजे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith). भारतीय गोलंदाजांना त्रास देणारा हा एक फलंदाज आहे. अनेक तज्ञानी त्याला निवडले होते. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने भारताविरुद्धच्या स्मिथच्या कामगिरीचे कौतुक केले. आणि स्मिथला बाद करण्यासाठी रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) निवड भारतीय गोलंदाजांमध्ये झाली आहे. अश्विनने हे हि सांगितले आहे कि, अक्षर पटेल हा असा गोलंदाज आहे त्याच्या चेंडूची गती आणि सातत्य हे दोन्ही स्मिथ साठी धोका ठरू शकते.
आर अश्विन म्हणाला कि, स्टीव्ह स्मिथ हा आपल्या भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असू शकतो. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान स्टीव्ह स्मिथला रोखण्यासाठी भारताला योग्य नियोजनाची गरज आहे.असे आर अश्विन म्हणाला.आणि माजी क्रिकेटपटू पठाण म्हणाले स्टीव्ह स्मिथचे आव्हान भारतीय क्रिकेट समोर असेलच पण एक माणूस ज्याची मला खूप चांगली भावना आहे त्यामध्ये अक्षर पटेल (Axer Patel) नंबर मिळवू शकतो. जर अक्षर नियमित पणे सामने खेळात असेल तर तो त्याचा मार्गक्रमण करतो. तो स्टीव्ह स्मिथ साठी मोठा धोका ठरू शकतो.
स्मिथ हा असा एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे ज्याची भारतीय परिस्थितीत सरासरी ६० पेक्षा जास्त आहे आणि अश्विनने सांगितले कि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक योग्य त्या योजना आखल्या पाहिजेत. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाला दिग्गज आहे त्यामध्ये काही शंकाच नाही जर तुम्ही क्रिकेट चा ऑस्ट्रेलियाचा इतिहासवर नजर टाकली तर तो अजूनही तिथेच आहे. आणि त्याने भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला आहे अनेक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघासाठी तो एक मजबूत हाथ आहे.
हे ही वाचा:
Valentine Week 2023 Full List, रोज डे ते किस डे पर्यंत जाणून घ्या सर्व तारखा…
Follow Us