spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

असदुद्दीन ओवेसी आणि भाजप हे खरे राम-श्याम, संजय राऊत यांनी दिले प्रत्युत्तर

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजपा (BJP) हेच खरे राम श्याम आहेत. शिवसेनेचे पाय मजबूत आहे आणि ती तिच्या पायावर मजबुतीने उभी आहे असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजपा (BJP) हेच खरे राम श्याम आहेत. शिवसेनेचे पाय मजबूत आहे आणि ती तिच्या पायावर मजबुतीने उभी आहे असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. जे सोडून गेले आहेत त्यांची आम्हाला पर्वा नाही. ओवेसी ही पार्टी भाजपची बी टीम असल्याचे लोक बोलत आहेत असे संजय राऊत म्हणाले. जेव्हा भाजपला जिंकायचे असते तेथे ओवेसी जात असते त्यामुळे त्यांच्या जोडीला राम श्याम ची जोडी म्हणाली पाहिजे. २५ फेब्रुवारी ला असदुद्दीन ओवेसी हे बोलताना म्हणाले कि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राम श्यामची जोडी आहे ते कधीही एकत्र येऊ शकतात या शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे ठाण्यातील मुंब्र्यामध्ये जाहीर सभेत असदुद्दीन ओवेसी हे बोलत होते.

पुण्यामध्ये चिंचवड आणि कसबा मतदानसंघाचे मतदान सुरु झाले आहे परंतु पुण्यामध्ये मतदान कमी होताना दिसत आहे. यावरून संजय राऊत यांना प्रश्न विचारला. संजय राऊत म्हणाले की, वोटिंग पर्सन्टेज आता जरी कमी असलं तरी ते वाढणार आहे. पुण्यामध्ये याच पद्धतीने मतदानाला सुरुवात होते. पुणेकर घरी बसणार नाही. कसबा चिंचवडमध्ये चांगले मतदान होणार आहे वाद आणि भांडणे होणार आहेत कारण सरकारकडून कसबा आणि चिंचवड मध्ये मंत्री बसले आहेत आणि हा नागरिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे जेव्हा पराभव समोर दिसत असेल तर लोकांना गोंधळ घालायला प्रवृत्त करत असतात संजय राऊत म्हणाले.

वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांबद्दल वारंवार राज्यमध्ये आणि देशामध्ये बोलले जाते. पेरणी जेव्हा वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली कि त्यांच्या तोंडाला फेस येतो. वीर सावरकर हे देशाच्या लढ्यातले महान क्रांतिकारक होते भारत देशामध्ये क्रांतीची मशाल पेटवणारे सावरकर हे महान नेते आहेत. वीर सावरकर यांनी अंदमानमध्ये आयुष्यातील मोठा कठीण काळ घालवला आहे. समाजाच्या कार्यांमध्ये त्यांनी काम केले आहे बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे असे संजय राऊत म्हणाले. सध्याच्या राजकारणाच्या उमेदवारांना हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वीर सावरकरांचा अपमान या देशामध्ये काही लोक करत आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी सावरकरांना भारतरत्न द्यावा असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा :

Chinchwad By Poll Election, चिंचवडमध्ये मतदानादरम्यान झाले वाद

अभिनय नाही… तर Supriya Pathare यांचा लेक करतोय फूड ट्रकचा व्यवसाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss