spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुझेच मी गीत गात आहे’; उर्मिला कोठारे सोडणार मालिका ?

अभिनेत्री उर्मिला कोठारे या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ने जवळपास १२ वर्षांनंतर ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech me Geet Gaat Ahe)  मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि खडतर परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची ही गोष्ट प्रेक्षकांना खूप भावते आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय. पण असे असतानाच अचानक अभिनेत्री उर्मिला कोठारे या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

आता पर्यंत ग्लॅमरस रूपात दिसलेल्या  उर्मिला कोठारे ला या मालिकेच्या निमित्ताने पेक्षकांना नो मेकअप लूक मध्ये पाहता आले. ती साकारत असलेले वैदेही हे पात्र प्रेक्षकांना आवडतय. त्यातच ‘तुझेच  मी गीत गात आहे’ ही मालिका आता भावनिक वळणावर येऊन पोहोचली आहे. यात वैदेही या पात्राचे निधन होणार आहे. याच कारणामुळे उर्मिला ची मालिकेतून एक्झिट होणार असल्याचे समजते.

मालिकेच्या कथानकात वैदेहीला कॅन्सर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चिमुकली स्वरा आपल्या आईच्या उपचारासाठी घरोघरी गाण्याचे कार्यक्रम सादर करून पैसे जमवतेय. परंतु वेळीच योग्य ते उपचार न मिळाल्याने वैदेही चा मृत्यू झाल्याचे एका प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अर्थातच उर्मिला साकारत असलेल्या पात्राची एक्झिट होणार असून उर्मिला यापुढे ‘तुझेच गीत मी गात आहे’ मालिकेत प्रेक्षकांना दिसणार नाही अशी अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरु आहे. पण खरंच उर्मिला ही मालिका सोडणार की एका नव्या भूमिकेत आपल्याला दिसणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Latest Posts

Don't Miss