आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच हल्लाबोल हल्लाबोल केला आहे. आज संजय राऊत हे दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. आज महाराष्ट्रात (Maharashtra) सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. तसेच शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याच अर्थ महाराष्ट्र खदखदतोय असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणलं असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती असा टोलाही राऊतांनी लगावला.
तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गटात कोणी प्रवेश केल्याने शिवसेनेच्या वाढीवर, विस्तारावर कोणताही परिणाम होणार नाही. एकदा आम्ही संघर्षाला उतरल्यावर सगळ्या संकटांना सामोरं जाऊ. शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी अनेक जणांना केली जात आहे. यासंदर्भात देखील राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी राऊत म्हणाले की, अटक करणं अत्यंत चुकीचं आहे. हा कायद्याचा गैरवापर असल्याचे राऊत म्हणाले. तो व्हिडीओ खरी की खोटा याचा आधी शोध घ्यावा असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात महिलांची बदनामी, शोषण होता कामा नये या मताचे आम्ही आहोत. महिलांबाबत सभ्यपणे शब्द वापरले पाहिजेत. सगळ्यांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे असे राऊत म्हणाले.
देशाच्या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर राजकीय विरोधकांनी संपवण्याचा डाव सुरु आहे. त्याच्याविरोधात राहुल गांधी बोलले. देशात रोज लोकशाहीची हत्या होत आहे. याबाबत राहुल गांधी बरोबर बोलल्याचे राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
हिपोक्रॅसीचीही काही मर्यादा असते , उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचले
डोंबिवलीतील गुडीपाडव्याच्या स्वागतयात्रेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार का?