मनोरंजन : चित्रपट निर्माता करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या पर्वात साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता अक्षय कुमार पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान समंथा आणि अक्षयने त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मोठे खुलासे केले. समंथाने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दलही खुलेपणाने सांगितले. त्याचबरोबर करण जोहरच्या चॅट शोमध्ये, समंथाने देखील कबूल केले की दोघांमध्ये अजूनही सर्व काही ठीक नाही.
हेही वाचा
कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे उर्वरित जंबो कोविड सेंटर बंद होण्याची शक्यता
समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. परंतु 2021 मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना घटस्फोटाची माहिती दिली. शो दरम्यान, जेव्हा करण जोहरने समंथाला विचारले की तिच्या पतीपासून वेगळे झाल्यानंतर तिला सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना कसा करावा लागला, तेव्हा अभिनेत्रीने लगेचच करणला रोखले आणि म्हटले, ‘ आधीचा पती.’ यावरूनच लक्षात येते की आता समंथाच्या मनात नागा चैतन्य बद्दल काय भावना असतील.
It’s her grand debut on the Koffee couch and he returns to claim his crown of entertainment and quirk!👑#HotstarSpecials #KoffeeWithKaranS7 episode 3 now streaming only on Disney+ Hotstar.
Watch now – https://t.co/OFIP7OFDJ9 pic.twitter.com/Bw3zt4gDJo
— Karan Johar (@karanjohar) July 21, 2022
यासोबतच समंथाने सांगितले की, तिने स्वेच्छेने तिचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले, त्यामुळे लोक तिला ट्रोल करत असताना ती तक्रार करू शकत नाही. अभिनेत्री म्हणाली, “मी खरोखर याबद्दल तक्रार करू शकत नाही कारण मी हाच मार्ग स्वीकारला आहे. म्हणून जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा मी ट्रोलिंगबद्दल नाराज होऊ शकत नाही कारण माझ्या आयुष्यात लोक आहेत.” मी माझ्या आयुष्यात लोकं कमावली आहेत. आणि त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझी होती. पण त्यावेळी मी ते करू शकले नाही.” यासोबतच तिने असेही सांगितले की तिच्यासाठी हे कठीण होते, परंतु आता सर्व काही ठीक आहे. मी पूर्वीपेक्षा स्ट्राँग झाले आहे.
पुढे समंथाने असेही सांगितले की, नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबत तिने बातम्यांमध्ये ऐकलेली सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिने चैतन्यकडे पोटगी म्हणून २५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अभिनेत्रीने हसत सांगितले की, ही बातमी समोर आल्यानंतर आयटी अधिकारी तिच्या घरावर कधी छापा टाकतील याची ती वाट पाहत होती.