मुंबई : गेल्या दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे मुंबई सह उपनगरे ठाणे,पालघर पुणे,पश्चिम महाराष्ट्र,विदर्भात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते नदी नाल्यांना पूर आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर मराठवाडा विदर्भात गडचिरोली येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाच्या या जोरदार हजेरीमुळे काही गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले होते. 1 जून पासून राज्यभरात पावसामुळे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
22 Jul, येत्या ३, ४ दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
🔸🌩️⚡️मेघगर्जनेशी संबंधित काही ठिकाणी.
🔸या शनिवार व रविवार, थोडा अधिक प्रभाव संभवतो.☔️☔️
🔸IMD GFS model guidance for 23-24 indicate strengthening of lower level westerlies over Konkan region.
– IMD pic.twitter.com/Hy8lzOZz3d— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2022
हवामान खात्याने येत्या शनिवार रविवारी राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसात पावसाची स्थिती ही मध्यम स्वरूपाची असणार आहे. मुंबई ठाणे पालघर परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची सततधार रसुरू होणार आहे.