मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष दिवसेंदिवस अडचणीत येत चालला आहे. आधी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि आता खासदारांनी ही शिवसेनेतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सेनेतून पक्ष वाचवण्यासाठी आणि वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. नुकतीच शिवसेना आमदार आणि माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. यातून ते तळागाळातल्या शिवसैनिकांना भेटून त्यांच्याशी संवाद वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी शिंदे गटाचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.
हेही वाचा
राज्यात पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
नुकतंच संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना शिंदे गटावर कडक शब्दात टीका केली. राऊत शिंदे गटाला उद्देशून म्हणाले, ”लोक त्यांची गाढवावरून धिंड काढल्या शिवाय राहणार नाहीत. त्यांची राजकीय तिरडी उठणारच असा कडक शब्दात इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला. राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल. जनता त्यांची गाढवावरून धिंड काढल्या शिवाय राहणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही.” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
जो तुफानोंमे पलते जा रहे हैं..
वही दुनिया बदलते जा रहे हैं!
_ जिगर मुरादाबादीं.@AUThackeray @BJP4Maharashtra @RahulGandhi @priyankagandhi @mieknathshinde @IpsaShatakshi
@MamataOfficial @supriya_sule@OfficeofUT @AUThackeray @kanhaiyakumar @ArvindKejriwal pic.twitter.com/jBTxTDSlBP— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
तसेच संजय राऊत यांनी आज पुन्हा ट्विट करत शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मविश्वासही वाढवण्याचा प्रयत्न केलाय. शायरी ट्विट करत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, जो तुफानो में पलते जा रहे हैं, वहीं दुनिया बदलते जा रहे हैं ! असं त्यांनी म्हटलंय. हे ट्विट राऊतांनी आदित्य ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल यांना हॅशटॅग केलं. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरुय. विशेष म्हणजे, राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव ही हॅशटॅग मध्ये सामील केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.