चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री राजीनामा घेणार का ? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला होता. तर जुना इतिहास उकरण्यात अर्थ नाही. परंतु बाबरी पाडकामातून बाळासाहेबांचं नाव कस पुसलं जाईल असा प्रश्न छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विचारला आहे. एक बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे अवमूल्यन करायचे हे बरोबर नाही असा टोलाही भुजबळांनी भाजपला लगावला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी पाडण्यामध्ये एकही शिवसैनिकांचा हा नाही असा आशयाचं वक्तव्य केलं होतं. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) अपमान केला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या ४० लोकांचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न विचारात शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं तर दुसरीकडे त्यांचे अवमूल्यन करायचे हे बरोबर नाही. आता त्या गोष्टी का उकरुन काढत आहेत? बाळासाहेबांचं नाव अशाने पुसलं जाणार नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगत पाटलांना ठणकावलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने राजकारण तापले आहे. यावर छगन बुजबळांनी आपले मत मांडले आहे ते म्हणाले की, निवडणूक आयोग नियमाप्रमाणे निर्णय घेतला असून त्याचा काही परिणाम होणार नाही. आम्हाला राज्यामध्ये चिन्ह आहे, इतर राज्यामध्ये चिन्ह मिळेल आता फक्त चार पाच पक्षांना राष्ट्रीय दर्जा आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी होत नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य भावना जराही नसल्याचे भुजबळ म्हणाले.
काही दिवसापूर्वी राज्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार भाजप संपर्कात असल्याची चर्चा आहे यावर छगन भुजबळ म्हणाले की, सगळे राजकीय पक्ष एकमेकांच्या संपर्कात असतात. एखाद्या कामासाठी भेटावं लागत स्थागिती उठवावी लागणार आहे मी देखील जाऊन भेटलो त्यामुळे त्यात गैर नाही आणि शरद पवार यांच्या जेपीसीबाबतच्या भूमिकेला समर्थन देत भुजबळ म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी जास्त असल्याने त्यांचा फायदा होणार आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बाबरी प्रकरणाच्या विधानावरून ते म्हणाले की, एका बाजूने बाळासाहेबांचं कौतुक करायचं, तर दुसरीकडे त्यांचे अवमूल्यन करायचे, हे बरोबर नाही. त्यावेळी भाजप नेते म्हणाले, आमचा संबंध नाही. बाळासाहेब म्हणाले मला अभिमान आहे, त्यावेळी विरोधामध्ये केस नको म्हणून बाळासाहेब पुढे आले होते. आता त्या गोष्टी का उकरुन काढत आहे? असा प्रश्न भुजबळ यांनी केला आहे.
हे ही वाचा :
Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात
Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई