spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

या अभिनेत्रीवर रस्त्यावर साबण विकण्याची आलीये वेळ

अभिनेत्रीने साऊथ मधील सुपरस्टार रजनीकांत आणि मोहनलाल यांसारख्या अभिनेत्यांसोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. मात्र आता तिच्यावर रस्त्यावर जाऊन साबण विकायची वेळ का आली

तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपटात अनेक अभिनेत्यांसह काम करणारी अभिनेत्री ऐश्वर्या वर आता रस्त्यावर साबण विकायची वेळ आली आहे. अभिनेत्रीने साऊथ मधील सुपरस्टार रजनीकांत आणि मोहनलाल यांसारख्या अभिनेत्यांसोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. मात्र आता तिच्यावर रस्त्यावर जाऊन साबण विकायची वेळ का आली हे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.
मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या म्हणाल्या की सध्या माझ्याकडे कोणतीही नोकरी नाही आणि अभिनय क्षेत्रातही तिला कामाची संधी मिळत नाही. याआधी मी अनेक मालिकेत काम केले आहे. पण आता मला पैश्याची गरज भासू लागली आहे. म्हणून माझ्यावर रस्त्यावर साबण विकायची वेळ आली आहे. हे ऐकून सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. ऐश्वर्या यांनी साठवलेल्या पैशातून नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. मात्र त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही.
ऐश्वर्या यांनी 1994 मध्ये तन्वीर अहमद यांच्या सोबत लग्न केले होते मात्र लग्नाच्या सहा महिन्यांत च त्यांच्यात वाद विवाद सुरू झाले. त्यांनतर 1997 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी ऐश्वर्या यांचा मुलगा दीड वर्षाचा होता. ऐश्वर्या यांची जीवन कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. अनेकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र मदत घेण्यास त्यांनी नकार दिला. नोकरी मिळाली तर ती सुद्दा मी करेन असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Latest Posts

Don't Miss