मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. कोश्यारी यांच्या विधानामुळे मुंबईचा अपमान झाल्याचे विरोधकांनसह नागरिकांचे म्हणणे आहे. “गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही”, असे वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्यमुळे राज्यभरातून विरोधक आपली प्रतिक्रिया मांडत आहे.
मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा… : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल, तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
आहे…
105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता..
मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना.
की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..
दिल्ली पुढे किती झुकताय? pic.twitter.com/qhjQ3nGEwf— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
राज्यपालांच्या या विधानबाबत आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करणार… : दीपक केसरकर
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, राज्यपालांनी जे विधान केले आहे ते राज्याचा अपमान करणारे विधान आहे. राज्यापाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना समज बजावू शकते. असे केसरकर यांनी मत मांडले.
मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा : आ. अमोल मिटकरी
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, आमदार मिटकरी यांची मागणी.
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.@BSKoshyari pic.twitter.com/osCB25qC5a
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 29, 2022
राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही… : आ. नितेश राणे
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले, राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात. असे नितेश राणेंनी म्हटले.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही..
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
हेही वाचा :
शिंदे सरकार घेणार नवा निर्णय; दहीहंडीला मिळणार सार्वजनिक सुट्टी?