spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मला केंद्रातल्या राजकारणात रस नाही – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी मागच्या वेळेस सुद्धा संधी साधत मोठी घोषणा केली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी मागच्या वेळेस सुद्धा संधी साधत मोठी घोषणा केली होती, आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात नवीन पडसाद उमटले. आणि नवीन चर्चा रंगू लागल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली.त्यामुळे राजकारणात लगेचच चर्चाना उधाण आले. अजित पवार यांचा पत्ता कट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली.त्यावर अजित पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवारांना बद्दलच्या चर्चा रंगल्या. परंतु यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्लीतील अकरा वाजताच्या मीटिंगला अजित पवार बारा वाजता आले, असं मीडियाने दाखवलं. ती मीटिंग पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याच्या पातळीवरचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे मी त्यावेळी नव्हतो अशा शब्दात सारवासारव करताना अजित पवार दिसले. तसेच या संबंधी सांगताना मूळात माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे,” असं अजित पवार म्हणाले.

मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. बारामतीकरांनी मला १९९१ साली निवडून दिलं ते मी सहा महिने तिथे खासदार म्हणून राहिलो. तिथलं चित्र पाहिलं. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. ३० ते ३२ वर्षांपूर्वी ठरवलं आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून मी आतापर्यंत महाराष्ट्रात काम करतोय, असं अजित पवार म्हणाले. या वर राजकीय चर्चा ह्या रंगू लागल्या आणि अणे बड्या नेत्याकडून या टीकेला उत्तर देखील देण्यात आली. राष्ट्रवादीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याला भाकरी फिरवली म्हणत नाही. ही सरळ सरळ धूळफेक आहे. यावर अजित पवार म्हणाले की, “हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. भाकरी फिरवली असं मीडियाने म्हटलं. पवारसाहेब भाकरी फिरवली असं म्हणाले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एखा राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु माझं मत असं आहे की, पक्षांतर्गत भाजपने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे, तसा राष्ट्रवादीने काय निर्णय घ्यावा हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचे आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यामुळे टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत नाही.असं देखील देवेंद्र फडांवस म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, या जिल्यामध्ये काही तासात होणार पावसाला सुरुवात

शरद पवारांच्या राजकीय भाकरीवर देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss