भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड हा नुकताच उत्कर्षा पवार सोबत लग्न बंधनात अडकला आहे. ऋतुराज याने नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघामधून उत्तम रित्या कामगिरी केली आहे. यावर्षीच्या आयपीएल (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली आहे. आयपीएल संपताच ऋतुराजने उत्कर्षा पवार सोबत लग्न गाठ बांधली. यामुळे ऋतुराजला भारताच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याला मुकावे लागले. २०१८ सालापासून ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्स कडून खेळण्याची सुरुवात केली. ऋतुराजचे चेन्नई च्या संघासोबत अतूट नाते तयार झाले आहे. ऋतुराजने लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर टाकून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. नुकतेच त्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर टाकले आहेत. ऋतुराजने त्याचा साखरपुडा हा चेन्नईच्या लोकांना समर्पित केला असून त्याने या पोस्टद्वारे त्याचे कारणही सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारणही काय आहे.
हे ही वाचा:
Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर
Aditya Thakare यांच्या वाढदिवसानिमीत्तकेलेल्या जीवनदानाबद्दल तुम्हला माहित आहे का? …
Rinku Singh आणि Yashasvi Jaiswal ला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान?