कालपासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जोरदार पाऊस असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमधील कोस्टल रोडची आज पाहणी केली. तसेच येथ पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.