spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांच्या हल्लाबोल, भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत नुकताच राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला. शिंदे गट आणि भाजप यांच्या सोबत मिळून अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी या होत आहेत नुकताच राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला. शिंदे गट आणि भाजप यांच्या सोबत मिळून अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज माध्यमांशी बोलत असताना त्यांनी भाजप वर चान्गलाच हल्लाबोल हा केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, फुटलेल्या लोकांचा पक्ष आणि चिन्हावर दावा करायचा विचार नव्हता. हे दिल्लीच डोकं होतं भाजपाचं. त्यांना महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे हे नाव नष्ट करायचे होते. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या लोकांना हाताशी धरून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलेला आहे. गुन्हेगारांची आणि त्यांची मोडस ऑपरेंडी सारखी आहे. हे राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, पक्ष फोडायचा आणि त्या पक्षावर दावा करायला लावायचा. जे स्वतः इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्राचा इतिहास पुसला जाणार नाही. शिवसेना ठाकरे गटाने कायदेशीर लढाई जिंकलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात फुटलेल्या आमदारांवर कार्यवाही होणार आणि तोच निर्णय हा राष्ट्रवादीच्या तुटलेल्या गटाला देखील लागू शकतो. कुठलं लोटस त्यांचेच ऑपरेशन झालं असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, अशी फूट पाडल्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशात भाजपचे वस्त्रहरण झालेले आहे, त्यांची वैचारिक सुंता झालेली आहे. भविष्यात तुमच्यावर देखील वेळ येऊ शकते. भ्रष्टाचाराला खूलं समर्थन भाजपाईंनी दिलं आहे मोदी २४ तासापूर्वी काय बोलतात आणि महाराष्ट्रात काय घडत हे जगाने पाहिलं आहे. जोपर्यंत त्यांना आत्मविश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाही. कितीही लोकं फोडली तरी मुंबई ठाणे महापालिकेवर आमच्या शिवसेनेचा भगवा फडकणार असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे संजय राऊत म्हणाले आहेत की, मुंबईला दोन वर्षापासून महापौर नाही नगरसेवक नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा देशाच्या राजकारणात देखील उलथापालथ होत आहे. भविष्यात महाविकास आघाडी सोबत काय करायचं आहे त्याबद्दल पक्षप्रमुख संवाद साधतील त्या संदर्भात बैठक सुरू आहे. १७, १८ जुलैला मी आणि उद्धव ठाकरे बॅंगलोरला जाणार आहोत. राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून काही नेते रडले आहेत. तसेच राऊत पुढे म्हणाले आहे की, फडणवीस आता विवाहित आहेत. आता मी त्यांना काही शाप देणार नाहीत. हे ढोंगी आहेत हे शब्दाला पक्के नाहीत. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून हे अनेक दिवस कारस्थान करत आहेत. कालची फूट ही त्यांच्या अविवाहित राहण्याचं लक्षण दिसत नाही.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss