spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान संसदेत होणार चर्चा

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा पुढील आठवड्यात दिनांक ८ ऑगस्ट रोजी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुरू होईल.

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा पुढील आठवड्यात दिनांक ८ ऑगस्ट रोजी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुरू होईल. ९ ऑगस्ट रोजी या विषयावर चर्चा सुरू राहणार असून दिनांक १० ऑगस्ट ला पंतप्रधान सभागृहात बोलणार आहेत. अलीकडेच मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली होती.

गेल्या आठवड्यात बुधवारी (२६ जुलै) सकाळी १० वाजण्यापूर्वी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभा सचिवालयात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना उद्देशून नोटीस दिली. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की ते आणि त्यांच्या विरोधी आघाडीचे भारताचे इतर खासदार सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत आहेत, ज्याला त्यांनी मान्यता द्यावी. गेल्या आठवड्यात २६ जुलै रोजी अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मग या प्रस्तावावर चर्चा करण्यास एवढा विलंब का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरे तर हे नियमांमुळे आहे. लोकसभेच्या अध्यक्षांना जेव्हा जेव्हा अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली जाते तेव्हा ते काही गोष्टी तपासतात. प्रथम, या प्रस्तावाला ५० हून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे की नाही.

या प्रस्तावाला ५० पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असल्याची लेखी पुष्टी मिळाल्यावर त्याला संसदेच्या पुढील १० कामकाजाच्या दिवसांत या प्रस्तावावर चर्चा करण्याचा अधिकार आहे. नियमांनुसार, ८ ऑगस्ट हा ९वा दिवस असेल, ज्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष या दिवशी सरकारला चर्चा करायला मिळतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या आरोपांवर भाष्य करुन त्यांना चोख उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विरोधकांकडून मांडण्यात आलेला अविश्वासाचा प्रस्तावाचे संसदेत काय पडसाद उमटणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता संसदेत या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागू राहिलं आहे.

हे ही वाचा:

संपूर्ण विदर्भासह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’..

WI vs IND, 2nd ODI: हार्दिक, संजू आणि सूर्याही फ्लॉप, भारताचा सहा विकेट्सने पराभव..

संजय शिरसाट यांच्या निशाण्यावर संभाजी भिडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss