Tuesday, September 24, 2024

Latest Posts

महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी; फडकवला तिरंगा

माउंट उटी कांगरी हे भारतातील लडाख येथील गिर्यारोहणाचे ठिकाण. या ठिकाणी शिखर ६ हजार ७० मीटर (१९,९१५ फूट) उंच आहे. त्यामुळे या उंचीवर जाण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. उटी कांगरी येथे चढण्याच धाडस केल्यास तिथं जाण्याचा अनुभव, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असावे लागते.

माउंट उटी कांगरी हे भारतातील लडाख येथील गिर्यारोहणाचे ठिकाण. या ठिकाणी शिखर ६ हजार ७० मीटर (१९,९१५ फूट) उंच आहे. त्यामुळे या उंचीवर जाण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. उटी कांगरी येथे चढण्याच धाडस केल्यास तिथं जाण्याचा अनुभव, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असावे लागते. मध्यम तसेच कठीण श्रेणीत गणला जाणारा माउंट उटी कांगरी गिर्यारोहकांचा चांगलाच कस काढतो. ७० अंशाच्या कोनात हे शिखर आहे. अंगावर येणारी चढाई चढताना आईस एक्स आणि क्रंपोन अश्या उपकरणाचा येथे चढण्यासाठी आधार घ्यावा लागतो. लडाखमधील माउंट युटी कांगरी हे ६ हजार ७० मीटर उंच शिखर. हे उंच शिखर सर करत भारताचा ७६ वा स्वतंत्रता दिवस महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी साजरा केला. या गिर्यारोहकांच्या टीममध्ये सोलापूरमधील गिर्यारोहक बालकृष्ण जाधव, नीलेश माने (कल्याण) आणि मुंबईतील गिर्यारोहक वैभव ऐवळे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची टीम ९ ऑगस्ट रोजी मुंबईहून या उंच शिखरावर चढण्यासाठी गेली. दोन दिवस लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेतले. ११ ऑगस्ट रोजी जवळपास ९० किलोमीटरचा प्रवास केला. टीमने रूमतसे गावातून ट्रेकला सुरुवात केली. हे गाव जवळपास ४३०० मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या टीमने २ तासाचा ट्रेक करत ४ हजार ८०० मीटर उंची गाठली. बेस कॅम्पला रात्रीचा मुक्काम ठोकला. माउंट उटी कांगरी येथे ० ते १ डिग्री तापमान असते. अशावेळी रात्र काढणे कठीण काम आहे. परंतु, गेल्या वेळचा अनुभव असल्याने टीमने तशी शारीरिक आणि मानसिक तयारी केली होती. या जोरावर त्यांनी ही मोहीम फत्ते केली.

दुसऱ्या दिवशी टीमने बेस कॅम्प ते कॅम्प ५ हजार ३५० मीटर उंचीवर नेला. ५-६ तासांच्या प्रवासानंतर निसर्गाचं मनमोहक दर्शन झालं. थोडा बर्फात लपलेला उटी कांगरी दिसला. डाव्या बाजूला नदी वाहत होती. परिसरात हिरवीगार गवत होते. चहूबाजूंनी पर्वतरांग पसरलेली होती. मनमोहक दृश्य बघताना पाठीवरचे वजन जाणवतं नव्हते. साधारणतः हाय अल्टिट्युडवर ऑक्सिजनची कमतरता असते. उणे तापमान, वेगाने वाहणारे वारे, स्नो फॉल, मोरेन्स अशी अनेक आव्हानं गिर्यारोहकांच्या टीमसमोर होती. नीलेश माने आणि वैभव एवळे यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो (५ हजार ८९५ मीटर उंच) आणि माउंट एलब्रूस (५ हजार ६४२ मीटर ) सर केले. त्यांनी अनुक्रमे भारतीय तिरंगा ध्वज फडकावत ७२ आणि ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा केला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

हे ही वाचा:

ठाण्यात आणि मुलुंडमध्ये काय आहे मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची परंपरा?

Taali Web Series, सुष्मिताला सलाम! आज या ओटीटी वर रिलीझ…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss