spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive, CP Vivek Phansalkar: प्रत्येक क्षणाला सुरु असते मुंबई पोलिसांची कसोटी

१ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातील ६५ बडे नेते एकत्र आले होत त्याचबरोबर उपराष्ट्रपती देखील उपस्थित होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठवाड्यातील जालन्यामध्ये अशा घटना घडली की , ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला झालेलं आणि त्यावेळे परिस्थिती चिघळतेय की काय असे वाटत होते.

१ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातील ६५ बडे नेते एकत्र आले होत त्याचबरोबर उपराष्ट्रपती देखील उपस्थित होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठवाड्यातील जालन्यामध्ये अशा घटना घडली की , ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला झालेलं आणि त्यावेळे परिस्थिती चिघळतेय की काय असे वाटत होते. परंतु मुंबई पोलीस हा सजक होता आणि आणि हे मुंबई पोलीस ६५ हुन अधिक आलेल्या बड्या नेत्यांच्या सुरक्षिततेचा भाग देखील त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यामुळे त्यानेच दिवशी मुंबई पोलिसांना तीन वेगवेगळ्या पण अगदी जबाबदारीची कामगिरी हि त्यांना सोपवण्यात आली होती. आणि महायुती चा देखील सत्ता टिकवण्यासाठी घातलेलं घाट या सगळ्याकडे लागलं होता. त्यामुळेच एकंदर काय तर पोलिसांची जणू काही तारेवरची कसरत चालूच होती. आणि म्हणूनच राज्यातले आणि केंद्रातले असे दोन्ही पोलीस कामाला लागले होते. या सगळ्यांचा प्रतिनिधित्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी १९८९च्या बॅचचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे होते. नेमके एकाच दिवशी या सर्व बड्या नेत्यांनी घातलेला घाट आणि त्यामध्ये पोलिसांची कामगिरी आणि जबाबदारी या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नेल्या यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

मुंबई पोलीस हा कायमचा कसोटीच्या काळातून जाणारा असा एक पोलीस डाळ आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कसोटीचे काळ बघितले आहे.त्यावेळी त्यांनी आवर्जून दोन मोठ्या बॉम्बस्फोटांचा उल्लेख केला तो म्हणजे १९९३ चे बॉम्बब्लास्ट आणि २६/११ चा भ्याड हलला. त्यानंतरचा काळ मात्र बऱ्यापैकी चांगला होता. आणि आता जर तुम्ही म्हणत असाल राजकीय कसोटींबद्दल विचारलं तर राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी या घडताच असतात. मात्र मुंबई या शहराचे आकर्षण असे आहे की , या शहरात सगळ्यांनाच येण्याची ईच्छा असता त्यामुळे त्या- त्या वेळी आम्हाला त्यांच्या संरक्षणही काळजी घेणे हे हि तितकेच आमच्यासाठी महत्वाचे असते. काष्ठ करणे, होणार त्रास झेलणं , कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे हे मुंबई पोलिसांसाठी आमचा एकूणच टीमचा वैशिष्ट्य आहे. या सगळ्यात आम्हाला महत्वाचे म्हणजे शांत चित्ताने विचार करून त्यातून मार्ग काढून परिस्थितीचा विचार करून कशी शांतता राहायला हवी या कडे कटाक्षाने लक्ष ठेवावे लागते. आणि तेही तितकेच महत्वाचे असते.

उद्धव ठाकरे यांनी बंगळुरू मध्ये जेव्हा सभा घेतली होती तेव्हा तुमच्या कार्यशैलीवर काही प्रश्न उपस्थित केले होते , त्यावर उत्तर येताना विवेक सरांकडून असे सांगितले की , माझ्या कार्यशैलीवर असा कोणताही आरोप किंवा काही वक्तव्य केले नव्हते असे त्यांनी थेट सांगितले परंतु, पोलिसांचे काम हे राजकारणाविरुद्ध चालत त्यात राजकारण हे राजकारणाच्या जागी असत. पोलीस आणि प्रशासन हे आपापली जबाबदारी त्यांच्या त्यान्च्युअ पद्धतीने पार पडत असतात. ज्यांना बड्या नेत्यांना त्यांच्यात्यांच्या सुरक्षा या दिल्या गेल्यात असतात अगदी त्याचप्रमाणे आमच्या अस्पेक्टस प्रमाणे देखील आम्हाला सुद्धा त्या सुरक्षेची कार्यवाही हि करावीच लागते. ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था चांगली राहणे महत्वाचे असू शकेल. त्याचबरोबर राज्यात होणारे राजकीय , सांस्कृतिक, क्रीडा , धार्मिक विषयक जे कार्यक्रम ठेवण्यात येतात ते त्या त्या प्रोटोकॉल ला अनुसरून आणि चौकटीत बसणारे असले पाहिजे जेणेकरून त्यामुळे राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही याकडे आमचे कायम लक्ष असते. इंडियाच्या बैठकीला जेव्हा २८ पक्षातून एकूण ६३ बडे नेते जेव्हा मुंबईमध्ये कार्यक्रमासाठी दाखल होतात तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याची जबाबदारी आणि एकूणच एवढा मोठा पोलीस ताफा कसा काय मॅनेज केला या संदर्भात जाणून घ्याल आम्ही आणि आमचे प्रेक्षक उत्सुक आहोत तर त्याबाबत विवेक फणसाळकर म्हणाले, आम्ही नियोजन करून मोठ्या प्रमाणात ताफा हा आम्ही बसून प्रत्यके गोष्टीचा आढावा घेऊन त्यासंदर्भातली मार्गांचा देखील विचार करून आम्हाला मुंबई करांच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.

मुंबई पोलिसांनी उलगडून सांगितले आठ तासाच्या कामाचं गणित विवेक फणसळकर म्हणाले, पोलीस दलाच्या कामाचे स्वरूपाचं असा आहे कि, शिफ्ट संपताना देखील काम आले तर ते करावं लागत. आणि त्यावेळी कोणताही कारण देता येत नाही. आणि त्यावेळी घटनास्थळी धावून जातात आणि म्हणूनच मला त्याबाबत अभिमान आहे. त्यामुळं मुंबई पोलियस हा सगळीकडे जातो हेही तितकेच खरे आहे. मुंबई पोलिसांच्या घरांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मुंबई पोलिसांच्या घरांचा विषय हा लावून धरलेला आहे असा वक्तव्य केले आहे. त्यानं सांगताना मुलुंड येथे तब्ब्ल ३५ मजली अशी जवळपास ९०० कोरटर्सची बिल्डिंग बांधण्यात येत आहे. त्यामध्ये कॉन्स्टेबल्स साठी २BHK चे फ्लॅट उपलब्ध तर मरोळ मध्ये ४०० ते ४५० चे फ्लॅट्स आणिजवळपास १५०० ते २००० फ्लॅट्सचे नवीन फ्लॅट्सचे काम चालू आणि ते लवकरच पूर्णत्वास जाणार असा मला विश्वास आहे. म्हाडाच्या घरांसंबंधी देखील हौसिंग सो. संबंधी आमच्या पोलीस दलाला नवीन आणि चांगले हेकोर्टर्स मिळाले पाहिजे अशी मागणी देखील विवेक फणसाळकर यांनी केली आहे.

सध्या सायबर गुन्हेगारी हि वाढत चालली आहे आणि त्यामुळे सायबर गुन्हेगारीमुळे मुंबईला खूप मोठा धोका किंवा संबंध देशाला सायबर गुहेगारीमुळे धिक संभवत आहे तर त्यावर काय महत्वाच्या उपपाययोजना केल्या आहेत याबाबत सगळ्याच पोलिसांवर ताबा मिळवू शकले नाहीयेत हे हि तितकाच खार आहे तर यावर तुम्ही कसा बघता, सायबर क्राईम हे विश्वाचा इतकाच मोठे झाले आहे की , गुन्हेगारी करणे हे अगदी सोपे झाले आहे. कारण अगदी प्रत्येकाकडे सगळ्याच प्रकारचे ऍक्सेस आले आहेत त्यामुळे मोबाईल, काम्पुटर, टॅब्स आणि इतर गीष्टींमुळे सायकर क्राईम हा वाढलेला आहे आणि तो फोफावत चालला आहे. सायबर क्राईममध्ये सायबरचे जाळे जवळ आले आहे मात्र गुन्हेगार हे लांब चालले आहेत. आणि गुन्हेगार या सायबरच्या जाळ्यात पारंगत असल्याने नवीन विश्वात चॅलेंजिंग आहे. याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे आताच्या सायबर विश्वात पोलिसांना या संदर्भात योग्य ट्रेनिंग देणे हि काळाची गरज आहे कारण या गोष्टी आत्ताच्या पिढीला सोप्या पद्धतीने चालवता येते मात्र आमच्या पिढीसाठी काहीसे कठीण जाऊ शकत म्हणून त्याचे प्रशिक्षकशन मिळणे हि काळाची गरज आहे असं मला वाटत. यासंबंधी सायबर जगतात अगदी सावधगिरीने वागले आणि राहिले पाहिजे. आपले अज्ञात व्यक्तीसोबत कोणताच आपला डेटा दिला गेला नाही पाहिजे . बँकांच्या संबंधी देखील आपण जागरूकता ठेवली पाहिजे. OTP कधीच अज्ञात व्यक्तींना शेअर करू नये. आपल्या नागरिकांनी जागरूक होऊन स्वतःच्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

सेक्सटॉर्शन हा गुन्हेगारीचा प्रकार नव्याने जो येऊ घातला आहे त्यावर तुम्ही काय सांगाल याबाबत विवेक फणसाळकरांनी सांगताना समाजाने देखील याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे,आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने हे बघितले पाहिजे कि, आधी आपले काही चुकले नाहीये ना. आपली स्वतःची वैयक्तिक चूक नाही आहे ना हे देखील पडताळणे बघितले पाहिजे. अनोळख्या व्यक्तीशी हितगुज साधणे टाळले पाहिजे. २९ जून २०२२ रोजीउधव ठाकरे यांनी तुमच्या फाईलवर केलेली सही ते आताच २९जून २०२३ या १ वर्षाच्या काळात तब्ब्ल ७०१ वेगवेगळी आंदोलने झाली. आणि आत्ताचा येऊ घातलेला हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव आणि त्यानंतर येऊ घालणारा मुस्लिम बांधवांचा ईद हा सण याकडे कसे बघता यावर विवेक सरानी अगदी परखडपणे सांगितले की या सगळ्यात आमची कसोटी हि असतेच. कर्ण कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असो अथवा कोणताही धर्मियांचा सण , उत्सव असो राज्यात , देशात शांतता , सुव्यवस्था राखावी यासाठी मुंबई पोलीस कायम तत्पर असते आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते. रोजचा दिवस हा कसोटीचा काळ असतो. त्याचबरोबर कोविडच्या काळात पोलीस भरती हि झाली नाही . मात्र त्यामुळे मनुष्यबळ हे फार कमी झाल. आणि त्यामुळे जवळपास १२००० मनुष्यबळ काम आहे. तरी देखील मुंबई पोलीस त्यांची कामगिरी अगदी योग्य पद्धतीने निभावत आहे. मुंबई पोलीस दलाच्या समोरची मोठी समस्या तुम्हाला प्रमुख म्हणूनकाय वाटते यावर क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, मुंबई हे दहशवादाचे टार्गेटवर असलेले शहर आहे आणि म्हणूनच दहशतवादी हल्ला पासून आम्ही कसे अलर्ट राहू याकडे आमचे कायम लक्ष लागलेले असते तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीला आळा घालणे त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता हे आमच्या समोरचे चॅलेंजेस आहे असे समजतो. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

 

Latest Posts

Don't Miss