सध्या राज्यासह शिर्डी मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस नसल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह चारा, विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सर्व पिके वाळून चालली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याच दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून येत्या शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार असण्याची माहिती तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिके जवळजवळ शंभर टक्के पावसाअभावी वाया गेले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी अति खोलवर गेल्याने पिण्याचे पाणी, जनावरांना चारा तर शेतकर्यांनी जागायचे कसे, असा यक्ष प्रश्न शेतकर्यांपुढे उभा आहे. शंभर वर्षात सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात पडल्याने निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोपरगाव, संगमनेर व पुणतांबा येथील नुकसान झालेल्या पिकांचे समक्ष पाहणी करणारा असून शेतकर्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ते शुक्रवारी नगरच्या दौर्यावर येणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.
या दौर्यात त्यांच्याबरोबर संपर्क नेते बबनराव घोलप, संपर्कप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, सहसंपर्क रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख मुजीब शेख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे आदींसह सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी राहणार आहे. शेतकरी आज पिण्याच्या पाण्यासाठी वंचित असून त्यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद करतील. शेतकर्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदतिसाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवाजीराव ठाकरे यांनी सांगितले.शेतकरी आज पिण्याच्या पाण्यासाठी वंचित असून त्यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद करतील. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल असे देखील सांगितले.
हे ही वाचा:
मुंबई- ठाण्यात एकूण १२४ गोविंदा जखमी
जी – २० परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज भारतात होणार दाखल