spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“तर पहिल्यांदा भारताला वाचवण्यासाठी येणार, अमेरिकेला नाही”अक्षय कुमारने केले सरकारला आवहान

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाकरिता चर्चेत आहे.सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अक्षय कुमार व्यस्त आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाकरिता चर्चेत आहे.सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अक्षय कुमार व्यस्त आहे.पुढील महिन्यात १० एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर त्याचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत टायगर श्रॉफही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत आतुरता लागली   आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ जबरदस्त ॲक्शन करताना दिसून येणार आहेत.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या एका प्रमोशनल कार्यक्रमात अक्षय कुमारने सरदारकडे मोठी मागणी केली. अक्षयला मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्याने भारत सरकारकडे मदत मागितली होती.अक्षयने केलेल्या या मागणीमुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४’ या कार्यक्रमासाठी गेलेला. तेव्हा त्याला प्रश्न विचारला की ‘ अमेरिकेत कलाकारांच्या बॉडी डबल्सना किंवा ॲक्शन करणाऱ्यांना खूप ओळख मिळते. पुरस्कार मिळतो. जर त्यांनी त्यांच्या देशाचा गौरव केला तर त्यांच्या देशातले सरकार त्यांना प्रमोट करते. मग अशी भावना आणि प्रोत्साहन भारतातही यायला हवं असे वाटतं का?

यावर अक्षय कुमारने उत्तर दिले, ‘हो, अगदीच.’ आपण लहानपणापासून चित्रपट पाहत आलो आहोत. आणि ही गोष्ट आपल्या मनात बिंबवली गेली आहे की जर कोणी दहशतवादी हल्ला केला तर अमेरिका आपल्याला वाचवेल, कारण आपण नेहमीच हॉलिवूडचे चित्रपट पाहत आलो आहोत. एलियन आले तर कोण वाचवणार? अमेरिका वाचवणार. कोणावरही कुठूनही हल्ला झाला तर सर्वांसाठी अमेरिकाच उपाय शोधणार.”मला ही गोष्ट बदलायची आहे. काहीही झाले तरी भारत वाचवेल. मला तेच करायचे आहे. सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला संधी द्या, आम्हाला आमच्या हवाई दल आणि लष्कराकडून खूप काही मिळते. पण त्याहून अधिकची अपेक्षा आहे. आम्हाला हेही दाखवायचे आहे की आयुष्यात काहीही झाले तरी भारत आपल्याला वाचवेल आणि भारत वाचवू शकतो.”

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ लवकरच ‘बडे मियाँ छोटे मियाँ या सिनेमातून एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटात व्हीएफएक्सचा कमी वापर केला आहे. दोघेही खरे स्टंट करतात किती मातब्बर आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.अक्षय आणि टायगरसह ‘बडे मिया छोटे मियां’ या सिनेमात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.दरम्यान ही तगडी स्टार कास्ट पाहण्यासाठी प्रेक्षकही उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

गोपाळ शेट्टींनी हातांनी कमावलं ते तोंडाने गमावलं, फटकळपणाने कामाच्या वाघाला घरी बसवलं | Gopal Shetty

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल, उद्या होणार यात्रेची सांगता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss