मधुमेह हा आजार भारत देशातील लोकांना होणार एक सामान्य आजार झाला आहे . मधुमेहाची लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.मधुमेह हा आजार आपल्या भारतदेशात खूप दिसून येतो. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली की मधुमेह या सारखे आजर होतात. मधुमेह नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे नाहीतर आपल्याला काही आजारांना सामोरे जावं लागत. मधुमेहमुळे आपल्याला सारखी सारखी लगवी होणे,तहान भूक वाढणे,थकवा लागणे,या सारखे लक्षणे दिसून येतात. मधुमेह हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.
- मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रोजचा रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
- मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रोजचा आहारामध्ये कारल्याची भाजी, काकडी,टोमॅटो, पालक,मेथी, या सारख्या भाज्यांचा भरपूर समावेश करावा.
- एकवेळी जास्त अन्न खाऊ नये भूक लागली की थोडे प्रमाणात अन्न खाणे.
- फळांमध्ये आंबा,केळी,सफरचंद,लिची,ही फळे कमी प्रमाणात खावी.
- बदाम,अक्रोड,अंजीर,काजू ,या यासारखे ड्रायफ्रूट खावे.
- साखर,गूळ,खजूर,बेदाणे यांचे सेवन कमी करावे.
- रिकाम्या पोटी तुळशीची पाने खावी त्यामुळे मधुमेह वर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- कोरफडचा गर ताकामध्ये घालून पिने त्यांनी मधुमेहाची समस्या दूर होते.
- मधुमेहला शहरीरासाठी भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
- मधुमेहसाठी आहारा वेळेवर घ्यावा.आणि कमी प्रमाणात सेवन करणे.
- जांभळाने मधुमेहातील लक्षणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. उंबराच्या फळांचे सेवन मधुमेहींना व्याधी संप्राप्ती कमी करणारे आहे. उंबराच्या फळांचे लोणचे अथवा इतर पदार्थ गुणकारी ठरतात.
- मधुमेही व्यक्तींनी कच्ची केळी खाल्ल्यास फायदा होतो.
- कोंबडा, कबूतर, बकरा यांचे मांस मधुमेहींनी सेवन करण्यास हरकत नाही. या प्राण्यांचे सूप, भाजलेले मांस सेवन केल्यास अधिक फायदा होतो. ते तयार करताना आले, लसूण, हळद, तमालपत्र, लवंग, वेलची यांचा वापर लाभदायक ठरतो.
हे ही वाचा:
आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा