spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशाच्या ‘उद्योग पळवे’ गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, Ambadas Danve यांचा Amit Shah यांच्यावर हल्लाबोल

पुणे येथे काल (रविवार, २१ जुलै) भाजप कार्यकारिणीची बैठक (BJP Meeting) पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी, त्यांनी उपस्थित भाजप (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत, “औरंगजेब फॅन क्लबचे नेता उद्धव ठाकरे, पीएफआयचे समर्थन आणि संभाजी नगरचा विरोध करणाऱ्यांच्या कुशीत शिरलेत.” असे वक्तव्य केले आहे. यावरून आता शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) चांगलाच आक्रमक झाला असून विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत , “दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला?” अश्या शब्दांत टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी आज (सोमवार, २२ जुलै) आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली. यात त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, “दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे.. देशाच्या ‘उद्योग पळवे’ गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे, घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे.”

ते पुढे म्हणाले, “राहिला प्रश्न संभाजीनगरचा.. बेगडी समर्थकांनी जे २०१४-१९ दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे.. तेवढं होतं का बघा!”

काय म्हणाले होते अमित शाह?

अमित शाह यांनी यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली. यावेळी ते म्हणाले, “या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत संबंधित आहे, पीएफआयला पाठिंबा देणाऱ्या आणि औरंगाबादचे संभाजी नगर असे नामकरण करण्याच्या विरोधात असणाऱ्यांच्या सोबत ते उभे आहेत. हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करू शकतो. महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आल्यावर आम्ही मराठा आरक्षण आणू. जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्हाला मराठा आरक्षण मिळाले. मराठा आरक्षण चालू ठेवायचे असेल तर भाजपला विजयी करा!” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Amit Shah यांना Uddhav Thackeray यांचं नाव घेतल्याशिवाय.., Sushma Andhare यांचा जोरदार हल्लाबोल

Sharad Pawar भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे नेते: Amit Shah

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss