शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (शनिवार, २७ जुलै) ६५ वा वाढदिवस असून मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Uddhav Thackeray Birthday) शिवसैनिकांनी जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अश्यातच आता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत, ‘आम्ही एकमेकांचे शत्रू थोडीच आहोत,’ असे वक्तव्य केले आहे. यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नेहमी एकमेकांवर टीका करणारे ठाकरे – फडणवीस हे पुन्हा एकत्र येणार का? अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हंटले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहिजे. आम्ही एकमेकांचे शत्रू थोडीच आहोत, पण बाकी शुभेच्छा कोण कुठे देते हे महत्वाचं..” फडणवीस यांनी हे सूचक वक्तव्य केल्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
फडणवीस यांच्याअगोदर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळतात की काय ? असे चित्र दिसू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे, “त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायला आवडतील!” असे विधान भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यापूर्वी ही चंद्रकांत पाटील विधिमंडळ अधिवेशन काळामध्ये पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अँड अनिल परब यांना निकालापूर्वीच भेटले आणि विजयाच्या शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये दिल्या होत्या.
राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय