अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. त्यांचे वडील कृष्णा वाजपेयी हे ब्रज भाषेचे निपुण कवी होते. काव्यात्मक गुण त्यांना वंशपरंपरेनेच मिळाला होता. अटल बिहारी वाजपेयी हे एक कवी, वक्ते आणि एक कुशल राजकारणी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी कानपुर येथील डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयात एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण देखील सुरु केले परंतु त्यांनी ते पूर्ण न करता सोडले आणि संघाच्या कार्यात रुजू झाले.
पंतप्रधान या नात्याने वाजपेयी यांचा कार्यकाळ महत्त्वपूर्ण कामगिरीने चिन्हांकित होता. त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा सुरू केल्या, भारताच्या अणुचाचण्यांवर देखरेख केली आणि पाकिस्तानसोबत राजनैतिक प्रयत्न सुरू केले. त्यांची आधुनिक, समृद्ध भारताची दृष्टी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि सर्व शिक्षा अभियान यांसारख्या उपक्रमांतून दिसून आली. त्यांचा वारसा राजकारणाच्या पलीकडे पसरलेला आहे, त्यांच्या सचोटीने, शहाणपणाने आणि राष्ट्रावरील प्रेमाने पिढ्यांना प्रेरणा देतो.
वाजपेयींची राजकारांसोबतच काव्यात्मक बाजूही तितकीच प्रभावी होती. देशभक्ती आणि आत्मनिरीक्षणाने केलेल्या लेखनातून त्यांचे भाषा आणि भावनेवरील प्रभुत्व आणि पकड दिसून आले. त्यांनी नमिता या मुलीला दत्तक घेतले. नमिताला घेतल्याने त्यांच्यातील माणुसकी आणि दयाळूपणाही दिसून येतो. त्यांच्या भाषण कौशल्याने त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्वतःचे नाव कोरून घेतले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या संपूर्ण आयुष्यात भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न यासह अनेक पुरस्कार मिळाले.
२००९ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. किडनी समस्या आणि इतर काही आजारांमुळे १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भारतात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. भारतासह चीन, अमेरिका, बांगलादेश, ब्रिटन, नेपाळ आणि जपान या देशांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी