spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MVA विरोधात BJP ‘खेटर मारो आंदोलन’ करणार: Chandrashekhar Bawankule

मालवणमधील राजकोट (Rajkot) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatrapati Shivaji Mahraj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज (रविवार, १ सप्टेंबर) “जोडो मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चाचे नेण्यात येणार आहे. या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजपच्या (BJP)  वतीनेही मविआच्या (MVA) आंदोलनाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईतील दादर परिसरात भाजपकडून मविआविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केले असून, “आम्ही महाविकास आघाडीविरुद्ध “खेटर मारो आंदोलन” करणार आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, “संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरु झाली आहेत. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महारज यांना वंदन करुन हे आंदोलन सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची क्षमा मागितली आहे तरी मविआचे नेते राजकारण करत आहेत. महाविकास आघाडी निवडणुकीच्या काळात राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “माझा त्यांना प्रश्न आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांनी महाराजांना दरोडेखोर म्हटले याचे उत्तर नाना पटोले देतील का? मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ असताना महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचे उत्तर नाना पटोले देतील का? संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाकडे तो वंशज असल्याचा पुरावा मागीतला याचे उत्तर उद्धव ठाकरे देतील का? जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होतं की अफजलखान व शाहिस्तेखान नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही याचे उत्तर शरद पवार देतील का? कॉंग्रेस मतांचे राजकारण करत आहे. आम्ही त्यांच्याविरोधात खेटर मारो आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कलंक आहात, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss