सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (शुक्रवार, ३० सप्टेंबर) जाहीर माफी मागितली. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसवर टीका करत, “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत आहे. परंतु, वीर सावरकरांना शिवीगाळ करूनही तुम्ही माफी मागायला तयार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
CM Shinde यांच्या हस्ते ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ