spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aaditya Thackeray यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग, राज्याला कृषी मंत्री आहे की नाही? Sanjay Raut यांचा सवाल

मराठवाडा आणि विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्य नागरिकांनाही पावसामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच युवासेनाप्रमुख आणि शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ह्यांनी आज (बुधवार, ४ सप्टेंबर) मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी खासदार संजय राऊत आणि इतर शिवसेना नेतेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी ‘”सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही,’ असे म्हणत महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका केली होती. यावरून कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ‘आदित्य ठाकरे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही,’ अश्या शब्दांत निशाणा साधला. त्यावर आता राजकीय वातावरण तापले असून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यावेळी माध्यामांशी संवाद साधत म्हणाले, “काल आम्ही दौऱ्याला गेलो होतो. ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले. तिकडे तरुण कार्यकर्ते यांची घरे, शाळा, गुरं, माणसं वाहून गेली. ग्रामीण भागातील रस्त्यातील काम सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले. सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरात मधील आहे. आता परभणीतल्या रस्त्यातील काम या ठेकेदारांना हिंगोली मधील रस्त्याचे काम या ठेकेदारांना महाराष्ट्रात तरुण मुलं नाही आहेत का? महाराष्ट्रात इंजिनियर्स नाही आहेत का जे हे काम करू शकतील? आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः आणि आमचे अनेक पदाधिकारी फिरत होतो. अवस्था खूप गंभीर आहे दुष्काळात सर्व काही वाहून गेले आहे अजून सरकारने पंचनामे केलेले नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “दुर्दैव असं आहे, गुजराती ठेकेदारांनी केलेली काम आहे आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग आली. कृषी मंत्री कोठे होते या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही. आदित्य ठाकरे येणार आहे कळल्यावर राज्याचे कृषिमंत्री गेले ते गाडीतून उतरले सुद्धा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाय जमिनीला लावला नाही. उलट कृषी मंत्री यांच्याकडे काही मागण्या करायला गेले तर शेतकरी यांच्या अंगावर कृषी मंत्री ओरडत राहिले मी काय करू. मी तुमच्या शेतातील काम करू का? हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले. पंचनामे नाही, पिक विमा, योजना नाही तुमच्या यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे? युवराज यांना सर्व समजत आहे. आम्ही तुम्हालाही समजून घेऊ शेतकऱ्यांच्या संदर्भात काल तुम्ही जी वागणूक केलेली आहे, मराठवाड्यात ते शेतकरी कधीही विसरणार नाही. तुम्हाला शेतीतल किती कळतय ते पुढल्या काही काळात कळेलच,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांचे काही पडलं नाही म्हणूनच आम्ही रात्रीपासून इथं शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पडलोय. आदित्य ठाकरे यांनी चार्टर विमानाने यावं आणि फोटो शूट करावं आणि पूतना मावशीचा प्रेम दाखवावं, यासारखं दुर्दैव काहीच नाही. आदित्य ठाकरे म्हणतात या राज्याला कोण कृषिमंत्री माहित नाही. आदित्य ठाकरे आणि मी दोघांनी बैल जोडी तीफनी वरती बसावं आणि कोणती पण मारते बघावं. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात, तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही, तीन वर्षानंतर आता बांधावर येत आहात. तेही निवडणूका समोर आहे म्हणून, अशा गलिच्छ राजकारणाला मला उत्तर द्यायचं नाही, ते राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलोय, कारण आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss