spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांचा हल्लाबोल, महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु…

सध्या सगळीकडे गणरायाच्या उत्सवात सर्वच मग्न आहेत. हा आडत साजरा करताना सगळेच आपल्याला दिसून येत आहेत. परंतु दुसरीकडे मात्र राज्यातील राजकारण काही थांबायचे नाव घेत नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे.

Sanjay Raut Criticise Amit Shah : सध्या सगळीकडे गणरायाच्या उत्सवात सर्वच मग्न आहेत. हा आडत साजरा करताना सगळेच आपल्याला दिसून येत आहेत. परंतु दुसरीकडे मात्र राज्यातील राजकारण काही थांबायचे नाव घेत नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यावेळी ते भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबत अमित शाह हे विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर उद्या सोमवारी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. आता अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात. मणिपूरमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, मुंबईत तुमचं काय आहे? अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला. “अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अमित शाह यांना आमचा विरोध यासाठीच आहे की त्यांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत, पण कमजोर गृहमंत्री आहेत, या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे”, असेही संजय राऊत म्हणाले. यावेळी राऊतांनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार टीका केली.”महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. लोकसभेचा निकाल ज्याप्रकारे महाराष्ट्राने दिले आहेत, त्यानुसार त्यांना विधानसभेत महाराष्ट्राला आणखी कमजोर करायचे आहे, त्यामुळे ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीत. जर हिंमत असेल तर विधानसभेच्या निवडणुका हरियाणासोबत घ्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही घ्या. मुंबई, पुणे, नागपूर यांची लूट करणे हाच तुम्हाचा सर्वाधिक मोठा धंदा आहे. मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात. मणिपूरमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, मुंबईत तुमचं काय आहे? मणिपूरला जाण्याची हिंमत करुन दाखवा”, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज म्हणाले, नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा…

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss