झी मराठी या वाहिनीवर लोकप्रिय मालिका अचानक बंद होणार म्हणून चाहते नाराज झाले होते. ही माहिती झी मराठी वाहिनीकडून समोर येत होती.गेल्या काही दिवसात झी मराठी वर नवनवीन मालिका येत आहे. ती म्हणजे “अप्पी आमची कलेक्टर” आणि “दार उघड बये” या मालिका सुरु होणार आहे. नवी मालिका सुरु होणार म्हणजे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर
झी मराठी वरील मालिकांचा चाहत्यांचा वर्ग खूप मोठा आहे. मालिकेमध्ये त्याच कथा , न पटणारे दृश्य , तेच अभिनय दाखवली की प्रेक्षक नाराज होतात. पण सध्या झी मराठी वरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. म्हणून चाहते नाराज झाले आहे. तसेच १९ सप्टेंबर पासून दार उगड बये ही मालिका प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. म्हणून माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यशवर्धन, समीर असुदे, नेहा किंवा छोटी परी हे कलाकार कायम चाहत्यांचा चर्चेत असल्याचे. तसेच त्यांनी या मालिकेतील शेवटच्या भागाचे शूटिंग केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. पण अचानक ही मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षक नाराज झाले आणि सोशल मिडीयावर वर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
View this post on Instagram
या सर्वांची माहिती घेऊन निर्मत्यानी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला. तसेच “माझी तुझी रेशीमगाठ”प्रेक्षकांची आवडती मालिका आता नवीन वेळेत संध्यकाळी६,३० येणार आहे. म्हणून प्रेक्षक खूप आनंदी आहे.
हे ही वाचा :
अभिनेता अजय देवगणची मोठी घोषणा