spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jogi review: दंगलीसारख्या विषयावर प्रकाश टाकणारी कथा म्हणजे ‘ जोगी ‘

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या दिलजीत दोसांझच्या 'जोगी' या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत.

कलाकार – दिलजीत दोसांझ, अमायरा दस्तूर, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अयुब, हितेन तेजवानी आणि परेश आहुजा

दिग्दर्शक – अली अब्बास जफर

कुठे पाहायचे – नेटफ्लिक्स

अली अब्बास जफर पुन्हा एकदा धमाल चित्रपट घेऊन आला आहे. पण यावेळी तो मोठ्या पडद्यावर नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अलीने जेव्हा ‘तांडव’ सीरिज बनवली होती तेव्हा सोशल मीडियावर आणि बाहेरही खूप त्याचे खूप कौतुक झाले होते. त्याची तांडव ही सीरिजअॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज करण्यात आली होती. आता अली ‘जोगी’ घेऊन हा नवा चित्रपट घेऊन येत आहे . नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या दिलजीत दोसांझच्या ‘जोगी’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत. चित्रपटाच्या शानदार ट्रेलरने सर्वांचे डोके चक्रावून सोडले आहे.

चित्रपटाची कथा दमदार आहे

अली अब्बास जफरच्या कोणत्याही चित्रपटाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा असतात. अली अब्बास जफरच्या ‘जोगी’ चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट तुमच्या मनात एक शंका निर्माण करतो. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या हिंसक घटना, तलवारी आणि गोळ्यांच्या आवाजाने चित्रपटाची सुरुवात होते. हे सर्व दृश्य पाहून तुमचा थरकाप उडेल. अलीने ‘तांडव’ची भरपाई करण्यासाठी हा चित्रपट बनवल्याचे दिसते. चित्रपट सुरू झाल्यानंतर २० – २५ मिनिटांनंतर जेव्हा हा चित्रपट आवडू लागे, तेव्हा तुम्हाला कळेल की चित्रपटाची कथा खरोखर मैत्री आणि प्रेमावर आधारित आहे. मैत्रीही त्या तीन मित्रांची आहे, ज्यापैकी एक शीख, एक हिंदू आणि एक मुस्लिम आहे.

चित्रपटाचा ट्रेलर येथे पहा-

 

मैत्रीची नवीन कहाणी पाहू शकता

मैत्रीवर आतापर्यंत अनेक चित्रपट बनले आहेत, मात्र काही मोजकेच चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. आता निर्माते अशा चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचारही करत नाहीत. पण ‘जोगी’ तुम्हाला एक रिफ्रेशिंग फील देईल. ही आजच्या काळाची गरज आहे असे वाटते. हसतमुख कुटुंबात सर्वजण सकाळी लवकर तयार होत असतात. महिला गरमागरम पराठे बनवत आहेत. पण तेवढ्यात गोळ्यांचा आवाज ऐकू येतो आणि सगळीकडे आग दिसते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात.

या चित्रपटात दिलजीत एका अशा माणसाची भूमिका साकारत आहे, जो त्याच्या कुटुंबियांवर खूप प्रेम करतो. त्याचा जीव स्थानिक लोकांमध्ये अडकलेला असतो. बेरोजगार दिलजीत अमायराच्या प्रेमात पडतो जोगी चित्रपटात संपूर्ण समाजाला वाचवण्याचे आव्हान नायकाने स्वीकारल्याचे दिसते. तसेच या दरम्यान त्याचे मित्र त्याला कशी मदत करतात आणि यातले खरे खलनायक कोण आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरते.

 

अली अब्बास जफरचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे.

अली अब्बास जफरचे जवळपास सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. ‘जोगी’ हा चित्रपट १९८४ च्या दंगलीला लक्षात घेऊन बनवला गेला आहे आणि हा चित्रपट दंगली दरम्यानच्या तीन दिवसांची कथा सांगेल. अलीने खूप दिवसांनी चांगला सिनेमा बनवला आहे. या चित्रपटात त्यांनी आयुष्यातील कटू वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे

दिलजीतने चित्रपटात चांगला अभिनय केला आहे. तसंच या चित्रपटातील बाकीच्या कलाकारांनीही उत्तम काम केलं आहे. यावेळी दिलजीतची व्यक्तिरेखा मैत्री, प्रेमाच्या अपेक्षा आणि समाजाच्या जबाबदाऱ्या या निकषांवर एकत्र घट्ट बसताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ हे एका खास प्रिझममधून पाहण्याच्या प्रयत्नात या चित्रपटाने आपली कथा अतिशय जाणीवपूर्वक मांडली आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांकडून प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा

लम्पीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आता क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss