राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका या पार पडला. आणि त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे. राज्यातील विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपले आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला देखील सुरुवात झाली आहे. अद्याप विधानसभा निवडणुकांची कोणतीही तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु पक्षांनी मात्र त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांकडून आमदारांची चाचपणी सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची खुर्ची नेमकी कोण मिळवणार याबाबत देखील अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या
मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या तक्रारीवर Devendra Fadnavis यांचे कठोर निर्देश